अ‍ॅपशहर

शेलार यांची चौकशी व्हावी

कोलकाता मॉडेलच्या धर्तीवर रिद्धी डीलमार्क आणि सर्वेश्वरा कंपनी स्थापन करून, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला.

Maharashtra Times 28 Jul 2016, 5:05 am
कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आपच्या प्री​ती शर्मा मेनन यांचा आरोप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai aap leader priti menon accuses ashish shelar
शेलार यांची चौकशी व्हावी


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कोलकाता मॉडेलच्या धर्तीवर रिद्धी डीलमार्क आणि सर्वेश्वरा कंपनी स्थापन करून, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत केला. शेलार यांच्या काळ्या पैशांच्या व्यवहाराची सखोल चौकशी केंद्राच्या अंमलबजावणी संचालनालय ईडी आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे तातडीने करण्यात यावी. तोपर्यंत त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी मेनन यांनी केली.

सर्वेश्वरा कंपनीचा पाच वर्षातील लेखाजोखा पाहता त्या कंपनीचे वार्षिक व्यवहार सरासरी १५ ते २० हजारांच्या घरात आहेत. कंपनीला पहिल्याच वर्षी २०१०-११ साली समभाग विक्रीद्वारे ३ कोटी ६० लाख रु. आणि कर्ज व अनामतीपोटी २६ लाख रु. निधी मिळतो. कंपनीचे कोणतेही व्यापारी धोरण नसताना दुसऱ्या वर्षी सहा कोटींचे कर्ज मिळते. विविध स्रोतांतून आलेल्या पैशाच्या माध्यमातून सर्वेश्वरा कंपनीची मालमत्ता १८ कोटींपेक्षा अधिक किंमतीची होते. हे मोठे गौडबंगाल असून हा सरळ काळ्या पैशांचा व्यवहार आहे, असा गंभीर आरोप श्रीमती मेनन यांनी केला. एका वर्षी तर प. बंगालच्या कोलकाता येथील रिद्धी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी १०.३० वाजता कोलकाता येथे होते तर नवी मुंबईतील बेलापूरच्या सर्वेश्वरा कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा त्याच दिवशी दुपारी तीन वाजता नवी मुंबईती​ल बेलापूर येथे होते. त्या दोन्ही सभांना संचालक म्हणून शेलार हजर राहतात, असे रेकॉर्ड आहे. ​त्यांची कार्यक्षमता किती अगाध आहे, हेच यावरून दिसते, असा आरोपही त्यांनी केला.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या दोन कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी आम्ही केली होती. प्रत्यक्षात त्या चौकशीत ही रक्कम ८०० कोटींच्या घरात गेली. आता शेलार प्रकरणात ईडीने चौकशीचे काम हाती घेतल्यास तीन दिवसात त्या गैरव्यवहारातील रकमेचे स्वरूप स्पष्ट होऊ शकते. या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करणारे निवेदन आपतर्फे निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, राज्यपाल, लोकायुक्त, अँटी करप्शन ब्युरो आणि ईडीला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी जाहीर न झाल्यास काय करणार असे विचारता, त्यासाठी आम्ही मुदत दिेलेली नाही. पण चौकशीसाठी कोर्ट व आंदोलनाचा मार्गही वेळप्रसंगी स्वीकारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

चौकशीला तयारः शेलार

दीड-दोन वर्षे माझ्या अधिकृत व्यवसायातील माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करून आरोप करण्यात येत आहेत. कधी मेसेज, कधी फोन तर कधी वर्तमान पत्रांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन आणि अॅन्टी करप्शन ब्युरोकडे निनावी तक्रारी करून संशयाचे वातावरण तयार केले जात आहे, हे राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे ‘आप’ने केलेल्या आरोपानंतर मीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एकदा चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी केल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. आपच्या नेत्यांनी केलेले आरोप फेटाळून लावत आपण चौकशीला तयार असल्याचे शेलार म्हणाले. मी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. नीट कर भरलेला आहे. त्या तीनही कंपन्यांमधील माझी प्रत्यक्ष ३५ लाख व अप्रत्यक्ष अशी एकूण गुंतवणूक ४५ लाखापेक्षा जास्त नाही, असे ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज