‘भारताचे संविधान’ पुस्तकाची सर्वाधिक विक्री
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रम होत असल्याने महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्यांची संख्या महापरिनिर्वाण दिनाच्या तुलनेत फारच कमी असते. तरीही दर्शनासाठी आलेले अनुयायी चैत्यभूमीच्या बाहेर लागलेल्या स्टॉलवर आवर्जून थांबून पुस्तके खरेदी करतात. पुस्तकांशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, यावर त्यांचा दृढ विश्वास असल्याने या दिवशी जवळपास दीड ते दोन लाखांची पुस्तके या दिवशी विकली जातात.
महापरिनिर्वाण दिनी पुस्तकांची विक्री कोट्यवधींची होते. त्या तुलनेत जयंतीच्या दिवशी होणारी विक्री फारच कमी असते, मात्र ही विक्री चैत्यभूमीबाहेर असलेल्या अवघ्या चार दुकानांमध्ये होते. चैत्यभूमीच्या बाहेरील सगळ्या दुकानांचा विचार केला, तर पुस्तके, शिल्प, झेंडे, मेणबत्त्या, तसबिरी या सगळ्या वस्तूंच्या विक्रीची गोळाबेरीज वीस ते पंचवीस हजारापर्यंत जाते. १४ एप्रिलला मात्र हीच विक्री अंदाजे पाच लाखांपर्यंत जाते, अशी माहिती पुस्तकविक्रेते साहेबराव पाटेकर यांनी दिली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अनेक नवीन पुस्तके प्रकाशितही होतात.
आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाची सर्वाधिक मागणी असते. ही मागणी इतर पुस्तकांच्या तुलनेत तिपटीहून अधिक असते. याबरोबरच ‘भारतीय राज्यघटना’, ‘शूद्र पूर्वी कोण होते?’, ‘पाकिस्तान अथवा भारताची फाळणी’, ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘अस्पृश्य मूळचे कोण?’, ‘त्रिपिटक, मिलिन्त प्रश्न’ या पुस्तकांनाही मोठी मागणी असते, अशी माहिती पुस्तकविक्रेते राजू ऊके यांनी दिली. चैत्यभूमीबाहेरील या दुकानांमध्ये नागपूर, औरंगाबाद आणि पुणे येथील प्रकाशकांचे साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामानाने मुंबईच्या प्रकाशकांची फारशी पुस्तके नाहीत.
वाचनातून ज्ञान मिळत जाते, अधिक माहिती मिळून गैरसमज दूर होतात त्यामुळे या चांगल्या दिवसासाठी पुस्तके खरेदी केली जातात, अशी भावना भिवंडीहून आलेल्या ऊर्जा यांनी व्यक्त केली. पूर्वसंध्येला एका अनुयायाने दहा हजार रुपयांचे आंबेडकरी साहित्य खरेदी केल्याचे यावेळी पाटेकर यांनी सांगितले. दरम्यान, येणाऱ्या अनुयायांच्या स्वागत आणि सोयीसाठी चैत्यभूमीजवळ खास मंडप उभारण्यात आला आहे आणि या परिसरातील रस्तेही धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत ठिकठिकाणी कार्यक्रम होत असल्याने महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्यांची संख्या महापरिनिर्वाण दिनाच्या तुलनेत फारच कमी असते. तरीही दर्शनासाठी आलेले अनुयायी चैत्यभूमीच्या बाहेर लागलेल्या स्टॉलवर आवर्जून थांबून पुस्तके खरेदी करतात. पुस्तकांशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, यावर त्यांचा दृढ विश्वास असल्याने या दिवशी जवळपास दीड ते दोन लाखांची पुस्तके या दिवशी विकली जातात.
महापरिनिर्वाण दिनी पुस्तकांची विक्री कोट्यवधींची होते. त्या तुलनेत जयंतीच्या दिवशी होणारी विक्री फारच कमी असते, मात्र ही विक्री चैत्यभूमीबाहेर असलेल्या अवघ्या चार दुकानांमध्ये होते. चैत्यभूमीच्या बाहेरील सगळ्या दुकानांचा विचार केला, तर पुस्तके, शिल्प, झेंडे, मेणबत्त्या, तसबिरी या सगळ्या वस्तूंच्या विक्रीची गोळाबेरीज वीस ते पंचवीस हजारापर्यंत जाते. १४ एप्रिलला मात्र हीच विक्री अंदाजे पाच लाखांपर्यंत जाते, अशी माहिती पुस्तकविक्रेते साहेबराव पाटेकर यांनी दिली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने अनेक नवीन पुस्तके प्रकाशितही होतात.
आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाची सर्वाधिक मागणी असते. ही मागणी इतर पुस्तकांच्या तुलनेत तिपटीहून अधिक असते. याबरोबरच ‘भारतीय राज्यघटना’, ‘शूद्र पूर्वी कोण होते?’, ‘पाकिस्तान अथवा भारताची फाळणी’, ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘अस्पृश्य मूळचे कोण?’, ‘त्रिपिटक, मिलिन्त प्रश्न’ या पुस्तकांनाही मोठी मागणी असते, अशी माहिती पुस्तकविक्रेते राजू ऊके यांनी दिली. चैत्यभूमीबाहेरील या दुकानांमध्ये नागपूर, औरंगाबाद आणि पुणे येथील प्रकाशकांचे साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामानाने मुंबईच्या प्रकाशकांची फारशी पुस्तके नाहीत.
वाचनातून ज्ञान मिळत जाते, अधिक माहिती मिळून गैरसमज दूर होतात त्यामुळे या चांगल्या दिवसासाठी पुस्तके खरेदी केली जातात, अशी भावना भिवंडीहून आलेल्या ऊर्जा यांनी व्यक्त केली. पूर्वसंध्येला एका अनुयायाने दहा हजार रुपयांचे आंबेडकरी साहित्य खरेदी केल्याचे यावेळी पाटेकर यांनी सांगितले. दरम्यान, येणाऱ्या अनुयायांच्या स्वागत आणि सोयीसाठी चैत्यभूमीजवळ खास मंडप उभारण्यात आला आहे आणि या परिसरातील रस्तेही धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत.