मुंबई:
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर आज पादचारी पुलाचा भाग कोसळला. ही घटना दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. या घटनेच्या चौकशीचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी १५ दिवसांत सादर करावा, असेही आदेश त्यांनी दिले.
रेल्वेमंत्री गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक रात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रेल्वेतर्फे करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
अशा प्रकारच्या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी मुंबईतील ४४५हून अधिक पुलांचे ऑडिट करण्यात येणार आहे. मुंबई आयआयटीतील तज्ज्ञांच्या मदतीनं आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं रेल्वे प्रशासन पादचारी पुलांचे ऑडिट करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दुर्घटनेवेळी प्रसंगावधान राखत लोकल थांबवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रकांत सावंत यांचे रेल्वेमंत्री गोयल यांनी कौतुक केले. त्यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यासाठी त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर आज पादचारी पुलाचा भाग कोसळला. ही घटना दुर्दैवी असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. या घटनेच्या चौकशीचा अहवाल रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी १५ दिवसांत सादर करावा, असेही आदेश त्यांनी दिले.
रेल्वेमंत्री गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पश्चिम रेल्वेवरील वाहतूक रात्रीपर्यंत पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे, असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च रेल्वेतर्फे करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
अशा प्रकारच्या संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी मुंबईतील ४४५हून अधिक पुलांचे ऑडिट करण्यात येणार आहे. मुंबई आयआयटीतील तज्ज्ञांच्या मदतीनं आणि मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं रेल्वे प्रशासन पादचारी पुलांचे ऑडिट करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दुर्घटनेवेळी प्रसंगावधान राखत लोकल थांबवून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणारे पश्चिम रेल्वेचे मोटरमन चंद्रकांत सावंत यांचे रेल्वेमंत्री गोयल यांनी कौतुक केले. त्यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यासाठी त्यांना पाच लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.