विरोधी पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा भाजपचा दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शिवसेना भाजपवर सतत दबावतंत्राचा वापर करत असल्याने आता हा दबाव झुगारून देण्याचे भाजपने ठरविले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे भाजपच्या संपर्कात असून त्यांच्या आधारे सरकार चालवण्याच्या मनस्थितीत भाजप आहे. अन्यथा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गुरुवारी चर्चा झाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेनेने सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव आणण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नात सहभागी होण्याचे ठरविले होते. तेव्हा शिवसेनेची समजूत काढावी लागली. त्यानंतर सत्तेत सहभागी असतानाही कर्जमाफीच्या विरोधकांच्या आंदोलनात शिवसेनेचे आमदार सहभागी झाले. विरोधी पक्षांच्या आमदारांना निलंबित करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही शिवसेनेने विरोध केला.
शिवसेनेच्या या भूमिकेबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार आक्षेप घेण्यात आला. सत्तेत राहून सेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असेल, तर मध्यावधी निवडणुकीला सामोरे गेलेले बरे, असा मुद्दा भाजपच्या नेत्यांनी या बैठकीत मांडला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते आमदारकीचे राजीनामे देण्यास तयार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणायचे, तर त्यातील काहींना विधानपरिषदेची आमदारकी द्यायची, यावरही याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. मात्र आता शिवसेनेचा दबाव झुगारून द्यायचा, असे भाजपने ठरविले आहे. वेळप्रसंगी मध्यावधी निवडणुकीलाही सामोरे जाण्याचे ठरविले आहे.
महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चद्रकांत पाटील आदी हजर होते.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून शिवसेना भाजपवर सतत दबावतंत्राचा वापर करत असल्याने आता हा दबाव झुगारून देण्याचे भाजपने ठरविले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे भाजपच्या संपर्कात असून त्यांच्या आधारे सरकार चालवण्याच्या मनस्थितीत भाजप आहे. अन्यथा मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गुरुवारी चर्चा झाली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेनेने सरकारविरोधातील अविश्वासदर्शक ठराव आणण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नात सहभागी होण्याचे ठरविले होते. तेव्हा शिवसेनेची समजूत काढावी लागली. त्यानंतर सत्तेत सहभागी असतानाही कर्जमाफीच्या विरोधकांच्या आंदोलनात शिवसेनेचे आमदार सहभागी झाले. विरोधी पक्षांच्या आमदारांना निलंबित करण्याच्या सरकारच्या निर्णयालाही शिवसेनेने विरोध केला.
शिवसेनेच्या या भूमिकेबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जोरदार आक्षेप घेण्यात आला. सत्तेत राहून सेना विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असेल, तर मध्यावधी निवडणुकीला सामोरे गेलेले बरे, असा मुद्दा भाजपच्या नेत्यांनी या बैठकीत मांडला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. ते आमदारकीचे राजीनामे देण्यास तयार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणायचे, तर त्यातील काहींना विधानपरिषदेची आमदारकी द्यायची, यावरही याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. मात्र आता शिवसेनेचा दबाव झुगारून द्यायचा, असे भाजपने ठरविले आहे. वेळप्रसंगी मध्यावधी निवडणुकीलाही सामोरे जाण्याचे ठरविले आहे.
महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चद्रकांत पाटील आदी हजर होते.