ध्वनिवर्धकातून कर्मचाऱ्यांच्या घरगुती गप्पा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
‘अरे भाई पचास हजारमे कैसे चलायेंगे.. कितना खर्चा बढ गया है…’ असे गार्डचे वाक्य लोकलमधल्या किमान तीन हजार प्रवाशांनी बसल्या जागेवर ऐकल्यावर प्रत्येक जण उडायचाच बाकी होता. पुढे तर पैशांच्या प्लॅनिंगवर गप्पांची गाडी वेगवेगळ्या मार्गांवरून धावत होती, हे सगळे घडले मंगळवारी दुपारच्या कर्जत लोकलमध्ये. त्याला जबाबदार होती लोकलच्या डब्यातली ध्वनिवर्धक यंत्रणा. स्पीकर सुरूच राहिल्याने गार्डच्या कौटुंबिक गप्पा संपूर्ण लोकलमधील प्रवाशांना ऐकू येत राहिल्या.
कर्जतहून दुपारी १.५७ वाजता निघालेली लोकल कल्याणपर्यंत पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे पंधरा-वीस मिनिटे उशिरा आली. कल्याणचा थांबा घेत लोकल निघाल्यावर अनेकांनी थोडी डुलकी घेण्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी डब्यातल्या स्पीकर्समधून खरखर आवाज येऊ लागला. बहुदा गाडी पुढे धावणार नाही, किंवा अन्य काही महत्त्वाची सूचना असावी, असा विचार करून प्रवासीही काय घोषणा होते याची वाट पाहू लागले. हा कर्णकर्कश्श आवाज तसाच सुरू राहिला. तोवर गाडी कल्याणहून पुढच्या प्रवासाला निघाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
प्रवासी तो आवाज कधी थांबतो, याची वाट पाहू लागले. पण तसे होण्याची दिसेनात. उलट डोंबिवली येता-येता अचानक त्यात माणसांच्या बोलण्याचे-गप्पांचे आवाज सामील झाले. सुरुवातीला हे आवाज कशाचे आहेत, याचा बोध होत नव्हता. हळूहळू या गप्पा बहुदा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या असाव्यात, असा अंदाज आला. जोडीला खरखर आवाज येतच होता. उन्हाच्या झळांनी वैतागलेल्या प्रवाशांना त्या आवाजातून नेमकी कशाची चर्चा होते आहे, हे समजत नव्हते. पण पगार आणि भविष्यातल्या काही प्लॅनच्या गप्पा सुरू असल्याचे कानावर पडत होते.
त्या वाक्यांनी अधूनमधून प्रवाशांमध्ये हास्यांचे फवारे तर कोणाच्या चेहऱ्यांवर कर्णकटू खरखरीने वैताग दिसत होता. मात्र तो आवाज बंद करण्यासाठी काय करावे, हे कोणालाच समजत नसल्याने हा गप्पांचा प्रवास सुरूच राहिला. ती कर्णकर्कश खरखर नसती, तर दोन तासांचा तो प्रवास गार्डच्या घरगुती गप्पा ऐकण्यात तरी रंगला असता, पण ‘मरे’च ती त्यामुळे असे होणे आपल्या नशिबात नाही, म्हणत प्रवासी आपाआपल्या स्थानकावर उतरले.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
‘अरे भाई पचास हजारमे कैसे चलायेंगे.. कितना खर्चा बढ गया है…’ असे गार्डचे वाक्य लोकलमधल्या किमान तीन हजार प्रवाशांनी बसल्या जागेवर ऐकल्यावर प्रत्येक जण उडायचाच बाकी होता. पुढे तर पैशांच्या प्लॅनिंगवर गप्पांची गाडी वेगवेगळ्या मार्गांवरून धावत होती, हे सगळे घडले मंगळवारी दुपारच्या कर्जत लोकलमध्ये. त्याला जबाबदार होती लोकलच्या डब्यातली ध्वनिवर्धक यंत्रणा. स्पीकर सुरूच राहिल्याने गार्डच्या कौटुंबिक गप्पा संपूर्ण लोकलमधील प्रवाशांना ऐकू येत राहिल्या.
कर्जतहून दुपारी १.५७ वाजता निघालेली लोकल कल्याणपर्यंत पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे पंधरा-वीस मिनिटे उशिरा आली. कल्याणचा थांबा घेत लोकल निघाल्यावर अनेकांनी थोडी डुलकी घेण्याची तयारी सुरू केली. त्याचवेळी डब्यातल्या स्पीकर्समधून खरखर आवाज येऊ लागला. बहुदा गाडी पुढे धावणार नाही, किंवा अन्य काही महत्त्वाची सूचना असावी, असा विचार करून प्रवासीही काय घोषणा होते याची वाट पाहू लागले. हा कर्णकर्कश्श आवाज तसाच सुरू राहिला. तोवर गाडी कल्याणहून पुढच्या प्रवासाला निघाल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
प्रवासी तो आवाज कधी थांबतो, याची वाट पाहू लागले. पण तसे होण्याची दिसेनात. उलट डोंबिवली येता-येता अचानक त्यात माणसांच्या बोलण्याचे-गप्पांचे आवाज सामील झाले. सुरुवातीला हे आवाज कशाचे आहेत, याचा बोध होत नव्हता. हळूहळू या गप्पा बहुदा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या असाव्यात, असा अंदाज आला. जोडीला खरखर आवाज येतच होता. उन्हाच्या झळांनी वैतागलेल्या प्रवाशांना त्या आवाजातून नेमकी कशाची चर्चा होते आहे, हे समजत नव्हते. पण पगार आणि भविष्यातल्या काही प्लॅनच्या गप्पा सुरू असल्याचे कानावर पडत होते.
त्या वाक्यांनी अधूनमधून प्रवाशांमध्ये हास्यांचे फवारे तर कोणाच्या चेहऱ्यांवर कर्णकटू खरखरीने वैताग दिसत होता. मात्र तो आवाज बंद करण्यासाठी काय करावे, हे कोणालाच समजत नसल्याने हा गप्पांचा प्रवास सुरूच राहिला. ती कर्णकर्कश खरखर नसती, तर दोन तासांचा तो प्रवास गार्डच्या घरगुती गप्पा ऐकण्यात तरी रंगला असता, पण ‘मरे’च ती त्यामुळे असे होणे आपल्या नशिबात नाही, म्हणत प्रवासी आपाआपल्या स्थानकावर उतरले.