व्ही. नारायण/रिचा पिंटो । मुंबई
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी खड्ड्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या अपघातामुळे पालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. अपघातात बचावलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्या खड्ड्याचा फोटो, अपघाताची माहिती सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून मुंबईकरांनी पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी रविवारी एक बैठक संपवून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अंधेरीतील सागर हॉटेल जंक्शनजवळ धर्माधिकारी यांची दुचाकी आठ इंच खोल आणि सुमारे चार फूट लांबीच्या खड्ड्यात अडकली. त्यामुळे धर्माधिकारी दुचाकीवरून पडले. दैव बलवत्तर असल्यामुळे मागून कोणतेही वाहन येत नव्हते अन्यथा अपघातामध्ये धर्माधिकारी गंभीर जखमी होण्याची शक्यता होती.
या अपघातानंतर धर्माधिकारी यांनी या खड्ड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की, 'रस्त्यावरील खड्डे दुचाकीस्वारांसाठी जास्त धोकादायक आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असल्यामुळे हे खड्डे समजून येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात. दुसरा कुणी या खड्ड्यात पडू नये म्हणून मी ही पोस्ट केली,' असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. 'ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास यावी, असाही उद्देश यामागं असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या प्रश्नी विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, सोमवारपासून महापालिकेने शहर, उपनगरातील १०० रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत असल्याचा दावा महापालिका करत असली तरी खड्ड्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या अपघातामुळे पालिकेच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. अपघातात बचावलेल्या पोलीस अधिकाऱ्याने त्या खड्ड्याचा फोटो, अपघाताची माहिती सोशल मीडियावर टाकली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून मुंबईकरांनी पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.
साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी रविवारी एक बैठक संपवून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अंधेरीतील सागर हॉटेल जंक्शनजवळ धर्माधिकारी यांची दुचाकी आठ इंच खोल आणि सुमारे चार फूट लांबीच्या खड्ड्यात अडकली. त्यामुळे धर्माधिकारी दुचाकीवरून पडले. दैव बलवत्तर असल्यामुळे मागून कोणतेही वाहन येत नव्हते अन्यथा अपघातामध्ये धर्माधिकारी गंभीर जखमी होण्याची शक्यता होती.
या अपघातानंतर धर्माधिकारी यांनी या खड्ड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले की, 'रस्त्यावरील खड्डे दुचाकीस्वारांसाठी जास्त धोकादायक आहेत. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असल्यामुळे हे खड्डे समजून येत नाहीत, त्यामुळे रात्रीच्या वेळी हे खड्डे जीवघेणे ठरू शकतात. दुसरा कुणी या खड्ड्यात पडू नये म्हणून मी ही पोस्ट केली,' असे अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे. 'ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास यावी, असाही उद्देश यामागं असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्याचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या प्रश्नी विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर, सोमवारपासून महापालिकेने शहर, उपनगरातील १०० रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.