मुंबई: मुंबई आणि जळगावमधून करोना रुग्ण गायब होण्याचे प्रकार ताजे असतानाच मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ६२ वर्षीय करोनाबाधित महिलेचा मृतदेह रुग्णालयातून गायब झाला. त्यामुळे शोधाशोध सुरू असतानाच तब्बल ६० तासानंतर या महिलेचा मृतदेह वांद्रे येथील स्मशानभूमीत सापडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाचा गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वांद्रे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ज्ञानती देवी या करोनाबाधित ६२ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले होते. या आधी सदर महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी पाच रुग्णालयात धाव घेतली. पण कोणीच दाखल करून न घेतल्याने या महिलेला २ जून रोजी वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ३ जून रोजी वादळाच्या भीतीमुळे या महिलेला कोविड सेंटरमधून इतर रुग्णालयात हलविण्यात आले. कोविड सेंटरमधील सर्वच रुग्णांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या महिलेला कोविड सेंटरमधून इतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची या महिलेच्या कुटुंबीयांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही.
करोनाचं संकट टळलेलं नाही; 'लॉकडाऊन'बाबत मुख्यमंत्री म्हणाले...
याच दरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने ६० तासानंतर या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तोपर्यंत या महिलेचा मृतदेह वांद्रे स्मशानभूमीत नेण्यात आला होता. आम्हाला स्मशानभूमीत पोहोचायला १० मिनिटे जरी उशीर झाला असता तर आम्हाला आमच्या आजीचे अंतिम दर्शनही घेता आले नसते, असं या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.
धारावी, दादर, माहीममधील करोना मृत्यूंची संख्या शंभरीपार
आजीचा उपचार करण्यासाठी जानेवारीत तिला मुंबईत घेऊन आलो होतो. १ जून रोजी तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. पण तिचे प्राण वाचू शकले नाही. स्मशानभूमीत आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे तीन मृतदेह होते. त्यापैकी दोन मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले होते, असं या महिलेचा नातू संदीप यांनी सांगितलं.
'ठाकरे सरकार'च्या 'या' निर्णयाला फडणवीसांनी दिला पाठिंबा!
वांद्रे येथील कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये ज्ञानती देवी या करोनाबाधित ६२ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले होते. या आधी सदर महिलेची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी पाच रुग्णालयात धाव घेतली. पण कोणीच दाखल करून न घेतल्याने या महिलेला २ जून रोजी वांद्रे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ३ जून रोजी वादळाच्या भीतीमुळे या महिलेला कोविड सेंटरमधून इतर रुग्णालयात हलविण्यात आले. कोविड सेंटरमधील सर्वच रुग्णांना मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या महिलेला कोविड सेंटरमधून इतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची या महिलेच्या कुटुंबीयांना कोणतीही सूचना देण्यात आली नाही.
करोनाचं संकट टळलेलं नाही; 'लॉकडाऊन'बाबत मुख्यमंत्री म्हणाले...
याच दरम्यान, या महिलेचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने ६० तासानंतर या महिलेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. तोपर्यंत या महिलेचा मृतदेह वांद्रे स्मशानभूमीत नेण्यात आला होता. आम्हाला स्मशानभूमीत पोहोचायला १० मिनिटे जरी उशीर झाला असता तर आम्हाला आमच्या आजीचे अंतिम दर्शनही घेता आले नसते, असं या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.
धारावी, दादर, माहीममधील करोना मृत्यूंची संख्या शंभरीपार
आजीचा उपचार करण्यासाठी जानेवारीत तिला मुंबईत घेऊन आलो होतो. १ जून रोजी तिला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले. पण तिचे प्राण वाचू शकले नाही. स्मशानभूमीत आम्ही पोहोचलो तेव्हा तिथे तीन मृतदेह होते. त्यापैकी दोन मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले होते, असं या महिलेचा नातू संदीप यांनी सांगितलं.
'ठाकरे सरकार'च्या 'या' निर्णयाला फडणवीसांनी दिला पाठिंबा!