म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल १ लाख ४९ हजार १९६ रुग्णांची वाढ झाली तर ७७ हजार ५६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या वर्षीच्या मे आणि जूनच्या तुलनेत मृत्यू कमी झाले असून, मागील महिनाभरात ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७० टक्के आहे.
मुंबईत नियंत्रणात आलेल्या करोना संसर्गाने फेब्रुवारीपासून पुन्हा डोके वर काढले आहे. यंदाच्या मार्चमध्ये रुग्णवाढीचा दर सर्वाधिक होता. ७ मार्चला मुंबईमध्ये ३ लाख ३३ हजार ५६४ रुग्ण होते. तर ७ एप्रिलला रुग्णांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६०वर पोहोचली. म्हणजे एका महिन्यात १ लाख ४९ हजार १९६ रुग्णांची भर पडली. रुग्णवाढीच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी असून ७ मार्चपर्यंत ११ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ एप्रिलला ही संख्या ११ हजार ८५१वर पोहोचली.
आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ३ लाख ८८ हजार ११ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५८ हजार २४६ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत अचानक झालेल्या वाढीमुळे पालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे.
रुग्णालयांवरील ताण कमी
मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८१ हजार ८८६वर पोहोचली आहे. यातील सुमारे ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे त्यातील बहुसंख्य रुग्णांवर घरात विलगीकरण करून उपचार केले जात आहेत. परिणामी रुग्णालये व करोना केंद्रांवरील ताण कमी झाला आहे.
अशी झाली रुग्णवाढ
७ मार्चपर्यंत : ३ लाख ३३ हजार ५६४
७ एप्रिलपर्यंत : ४ लाख ८२ हजार ७६०
महिनाभरात वाढ : १ लाख ४९ हजार १९६
मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या महिनाभरात तब्बल १ लाख ४९ हजार १९६ रुग्णांची वाढ झाली तर ७७ हजार ५६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या वर्षीच्या मे आणि जूनच्या तुलनेत मृत्यू कमी झाले असून, मागील महिनाभरात ३५१ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७० टक्के आहे.
मुंबईत नियंत्रणात आलेल्या करोना संसर्गाने फेब्रुवारीपासून पुन्हा डोके वर काढले आहे. यंदाच्या मार्चमध्ये रुग्णवाढीचा दर सर्वाधिक होता. ७ मार्चला मुंबईमध्ये ३ लाख ३३ हजार ५६४ रुग्ण होते. तर ७ एप्रिलला रुग्णांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६०वर पोहोचली. म्हणजे एका महिन्यात १ लाख ४९ हजार १९६ रुग्णांची भर पडली. रुग्णवाढीच्या तुलनेत मृत्यूची संख्या कमी असून ७ मार्चपर्यंत ११ हजार ५०० जणांचा मृत्यू झाला होता. तर ७ एप्रिलला ही संख्या ११ हजार ८५१वर पोहोचली.
आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ३ लाख ८८ हजार ११ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने उपाययोजनांमध्ये वाढ केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५८ हजार २४६ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्येत अचानक झालेल्या वाढीमुळे पालिकेचा आरोग्य विभाग चिंतेत आहे.
रुग्णालयांवरील ताण कमी
मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या ८१ हजार ८८६वर पोहोचली आहे. यातील सुमारे ८० टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे त्यातील बहुसंख्य रुग्णांवर घरात विलगीकरण करून उपचार केले जात आहेत. परिणामी रुग्णालये व करोना केंद्रांवरील ताण कमी झाला आहे.
अशी झाली रुग्णवाढ
७ मार्चपर्यंत : ३ लाख ३३ हजार ५६४
७ एप्रिलपर्यंत : ४ लाख ८२ हजार ७६०
महिनाभरात वाढ : १ लाख ४९ हजार १९६