काळबादेवी आग; अग्निशमन अधिकाऱ्यांचा मृत्यूपश्चात सन्मान
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
काळाबादेवी येथील गोकुळ हाऊसला लागेल्या आगीत कर्तव्य बजाविताना वीरमरण आलेल्या अग्निनशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना राज्य सरकारने 'शहीद' दर्जा बहाल केला आहे. राज्य सरकारने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करीत ही घोषणा केली. या निर्णयामुळे या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मे, २०१५मध्ये काळाबादेवी येथील गोकुळ हाऊस या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमुळे आसपासच्या रहिवाशांचा जीवही धोक्यात आला होता. त्यामुळे अग्निशमन दलाला तातडीने व युद्धपातळीवर बचाव मोहीम हाती घ्यावी लागली होती. मात्र या आगीचे रौद्र रूप पाहून अखेर मुंबई अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांनीही प्रत्यक्ष बचाव कार्यात झोकून दिले. तसेच उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर गोपाळ अमीन, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे व केंद्र अधिकारी महेंद्र मधुसूदन देसाई यांनीही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र त्यात या सर्वांना वीरगती प्राप्त झाली.
या अधिकाऱ्यांना ‘शहीद’ दर्जा मिळावा, म्हणून महानगरपालिकेने जून, २०१५मध्ये विशेष सभा घेऊन याबाबतचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार अखेर सरकारने सोमवारी हा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्वागत केले आहे.
न्याय्य लाभ
शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या सवलतींच्या धर्तीवर सर्व अनुज्ञेय सवलती आणि फायदे महानगरपालिका निधीतून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये कुटुंबीयांना घर, कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर सेवेत नियुक्ती, २५ लाख रु.पर्यंत मुदत ठेव स्वरूपातील सानुग्रह अनुदानातून मिळणारे व्याज, दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा/उच्चशिक्षणाचा खर्च त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
काळाबादेवी येथील गोकुळ हाऊसला लागेल्या आगीत कर्तव्य बजाविताना वीरमरण आलेल्या अग्निनशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना राज्य सरकारने 'शहीद' दर्जा बहाल केला आहे. राज्य सरकारने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करीत ही घोषणा केली. या निर्णयामुळे या अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मे, २०१५मध्ये काळाबादेवी येथील गोकुळ हाऊस या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमुळे आसपासच्या रहिवाशांचा जीवही धोक्यात आला होता. त्यामुळे अग्निशमन दलाला तातडीने व युद्धपातळीवर बचाव मोहीम हाती घ्यावी लागली होती. मात्र या आगीचे रौद्र रूप पाहून अखेर मुंबई अग्निशमन दलाचे तत्कालीन प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांनीही प्रत्यक्ष बचाव कार्यात झोकून दिले. तसेच उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर गोपाळ अमीन, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे व केंद्र अधिकारी महेंद्र मधुसूदन देसाई यांनीही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र त्यात या सर्वांना वीरगती प्राप्त झाली.
या अधिकाऱ्यांना ‘शहीद’ दर्जा मिळावा, म्हणून महानगरपालिकेने जून, २०१५मध्ये विशेष सभा घेऊन याबाबतचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानुसार अखेर सरकारने सोमवारी हा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारच्या या निर्णयाचे मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्वागत केले आहे.
न्याय्य लाभ
शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या सवलतींच्या धर्तीवर सर्व अनुज्ञेय सवलती आणि फायदे महानगरपालिका निधीतून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये कुटुंबीयांना घर, कुटुंबातील एकास अनुकंपा तत्त्वावर सेवेत नियुक्ती, २५ लाख रु.पर्यंत मुदत ठेव स्वरूपातील सानुग्रह अनुदानातून मिळणारे व्याज, दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा/उच्चशिक्षणाचा खर्च त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.