अ‍ॅपशहर

मुंबई, ठाण्यात मुसळधार

मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे.

Maharashtra Times 19 Aug 2017, 12:36 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई/ठाणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai heavy rain disrupts local service
मुंबई, ठाण्यात मुसळधार


मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळं लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघरमध्ये पावसानं बऱ्याच दिवसानंतर दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व चिरनेर येथे गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिरनेर गावातील रस्त्या व गल्ल्यांमध्ये कंबरेएवढं पाणी तुंबलं आहे.

२४ तासांत १४१.९ मिमीची नोंद

नागपूरसह विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय. नागपूर शहरात काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहतूक वळविण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज