अ‍ॅपशहर

एसटी संप: हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे

एसटी संपावरून आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत का?, लोकांची काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का?, असे प्रश्न विचारताना इतर काही ऐकण्यात आम्हाला रस नाही, असेही हायकोर्टाने सरकारला सुनावले.

Maharashtra Times 20 Oct 2017, 6:04 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai high court slams fadnavis government for msrtc strike
एसटी संप: हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे


एसटी संपावरून आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत का?, लोकांची काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे का?, असे प्रश्न विचारताना इतर काही ऐकण्यात आम्हाला रस नाही, असेही हायकोर्टाने सरकारला सुनावले.

एसटी कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी ऐन दिवाळीत संप पुकारला असून या संपामुळे गेले चार दिवस प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ग्रामीण भागात या संपाचा मोठा फटका बसला आहे. या संपावरून आज हायकोर्टाने सरकारला चांगलेच फटकारले.

कोर्ट येथे तडजोड करायला बसलेलं नाही, असं नमूद करताना संप मिटवण्यासाठी ठोस फॉर्म्युला आणि काही धोरण निश्चित करण्यात आले आहे का, अशीही विचारणा कोर्टाने सरकारकडे केली. उच्चस्तरीय समितीचं काय झालं, असा प्रश्नही कोर्टाने विचारला. त्यावर सरकारने सोमवारी ही उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, असे कोर्टाला सांगितले. त्यानंतर संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सकारात्मक पाऊल टाकावे, असे कोर्टाने सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असून त्यांनी आश्वासन दिल्यास संप मागे घेण्याबाबत विचार करू, अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनेने कोर्टात मांडली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज