म.टा.प्रतिनिधी, मुंबई
वडाळा येथील ‘हिमालयन हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अॅड. पल्लवी पूरकायस्थ (२५) या वकील तरुणीची दोन वर्षांपूर्वी घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अपार्टमेंटचा सुरक्षारक्षक सज्जाद अहमद मुघल या पोलिसांनी अटक केली होती. मात्र अटकेनंतर जामीनावर मुक्त झालेला सज्जाद मुघल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान नुकतीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुघलला जम्मू काश्मिरच्या श्रीनगरच्या उरी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
वडाळा परिसरातील भक्तीपार्कमधल्या हिमालयन हाईट्समध्ये पल्लवी पूरकायस्थ मित्र अविक सेनगुप्ता सोबत राहत होती. दोघे लवकरच लग्नही करणार होते. पल्लवी ही निर्माता-अभिनेता फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या लिगल सेलमध्ये सल्लागार होती. पल्लवी रहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये आरोपी सज्जाद मुघल हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेला सज्जाद मुघलला पल्लवीच्या राहणीमानाने त्याला भुरळ घातली होती, त्यामुळे तो सतत तिच्यावर पाळत ठेवून असायचा. ९ ऑगस्ट २०१२ रोजी सज्जादने जाणीवपूर्वक सोसायटीचा लाइट बंद करत. बनावट चावीच्या आधारे तो तिच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिने त्याला प्रतिकार केल्यानंतर त्याने तिची हत्या केली होती. वडाळा टीटी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत, पोलिसांनी अवघ्या काही तासात सज्जाद मुघलला अटक केली होती. पुढे पोलिसांनी न्यायालयात सज्जाद मुघलवर ४३४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात न्यायालयाने सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार सज्जाद मुघलला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
या निर्णयाविरोधात सज्जाद मुघलने पुढे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सज्जादला २८ फेब्रुवारी २०१६ रोजी ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र पॅरोलवर सुटलेला सज्जाद अहमद मुघल हा पून्हा परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सज्जाद तुरुंगातून पळाल्यानंतर थेट त्याच्या गावी जम्मू काश्मिर मधील उरी येथील सल्लाना बाद येथे गेला होता. मात्र पोलिस कधीही आपल्या गावी येतील. त्यामुळे शेजारच्या गावातील नातेवाईकांकडे रहायला जायचा. वेळोवेळी तो आपले ठिकाण बदलायचा. त्यामुळे पोलिसांनना शोधणे अवघड झाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी जम्मू काश्मिरमधील खबऱ्यांच्या मदतीने सज्जादी माहिती काढण्यास सुरूवात केली. मुंबई गुन्हे शाखेचे पाच जणांचे विशेष पथक सज्जादच्या शोधासाठी नेमण्यात आले होते. एका वर्षात पोलिसांनी तब्बल ४ वेळा जम्मू काश्मिरचा दौरा केला. मात्र त्यांच्या हाती अपयश आले. सज्जानच्या गावाजवळ गगनगिर भागात एका भोगद्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी कामगारांची गरज होती. खिशातील पैसे संपत आल्याने सज्जान त्या ठिकाणी कामाला गेला होता. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना जम्मूतील स्थानिक खबऱ्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सज्जानला अटक केली. बुधवारी सज्जानचा ताबा नाशिक रोड पोलिसांना दिला जाणार असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त पडसलगीकर यांनी सांगितले.
वडाळा येथील अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला वॉचमन सज्जाद मुघल हा आठ महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर गेला आणि त्यानंतर कारागृहात परत आलाच नाही. तो फरार झाला. त्यामुळे राज्य सरकारने बलात्कार, खून, दरोडा यासह इतर गंभीर प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. परिणामी, पल्लवी खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले.
सज्जानला पकडण्यासाठी काश्मिरी वेश
सज्जान हा खूपच हुशार होता. स्वतःची ओळख पटू नये.यासाठी त्याने केश आणि दाढी देखील वाढवली होती. पोलिस नेहमीच्या वेशात त्या समोर किंवा आसपास गेले असते, तर त्याने लगेच त्यांना ओळखले असते. त्यामुळे सज्जानची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी ही काश्मिरी पेहरावा करत, स्वतःची दाढी आणि केश वाढवले होते.
वडाळा येथील ‘हिमालयन हाइट्स’ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या अॅड. पल्लवी पूरकायस्थ (२५) या वकील तरुणीची दोन वर्षांपूर्वी घरात घुसून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अपार्टमेंटचा सुरक्षारक्षक सज्जाद अहमद मुघल या पोलिसांनी अटक केली होती. मात्र अटकेनंतर जामीनावर मुक्त झालेला सज्जाद मुघल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान नुकतीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुघलला जम्मू काश्मिरच्या श्रीनगरच्या उरी परिसरातून अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली.
वडाळा परिसरातील भक्तीपार्कमधल्या हिमालयन हाईट्समध्ये पल्लवी पूरकायस्थ मित्र अविक सेनगुप्ता सोबत राहत होती. दोघे लवकरच लग्नही करणार होते. पल्लवी ही निर्माता-अभिनेता फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या लिगल सेलमध्ये सल्लागार होती. पल्लवी रहात असलेल्या अपार्टमेंटमध्ये आरोपी सज्जाद मुघल हा सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. मूळचा जम्मू-काश्मीरचा रहिवासी असलेला सज्जाद मुघलला पल्लवीच्या राहणीमानाने त्याला भुरळ घातली होती, त्यामुळे तो सतत तिच्यावर पाळत ठेवून असायचा. ९ ऑगस्ट २०१२ रोजी सज्जादने जाणीवपूर्वक सोसायटीचा लाइट बंद करत. बनावट चावीच्या आधारे तो तिच्या घरात घुसला. त्यावेळी त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिने त्याला प्रतिकार केल्यानंतर त्याने तिची हत्या केली होती. वडाळा टीटी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत, पोलिसांनी अवघ्या काही तासात सज्जाद मुघलला अटक केली होती. पुढे पोलिसांनी न्यायालयात सज्जाद मुघलवर ४३४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात न्यायालयाने सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार सज्जाद मुघलला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
या निर्णयाविरोधात सज्जाद मुघलने पुढे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी सज्जादला २८ फेब्रुवारी २०१६ रोजी ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र पॅरोलवर सुटलेला सज्जाद अहमद मुघल हा पून्हा परतलाच नाही. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सज्जाद तुरुंगातून पळाल्यानंतर थेट त्याच्या गावी जम्मू काश्मिर मधील उरी येथील सल्लाना बाद येथे गेला होता. मात्र पोलिस कधीही आपल्या गावी येतील. त्यामुळे शेजारच्या गावातील नातेवाईकांकडे रहायला जायचा. वेळोवेळी तो आपले ठिकाण बदलायचा. त्यामुळे पोलिसांनना शोधणे अवघड झाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी जम्मू काश्मिरमधील खबऱ्यांच्या मदतीने सज्जादी माहिती काढण्यास सुरूवात केली. मुंबई गुन्हे शाखेचे पाच जणांचे विशेष पथक सज्जादच्या शोधासाठी नेमण्यात आले होते. एका वर्षात पोलिसांनी तब्बल ४ वेळा जम्मू काश्मिरचा दौरा केला. मात्र त्यांच्या हाती अपयश आले. सज्जानच्या गावाजवळ गगनगिर भागात एका भोगद्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी कामगारांची गरज होती. खिशातील पैसे संपत आल्याने सज्जान त्या ठिकाणी कामाला गेला होता. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांना जम्मूतील स्थानिक खबऱ्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सज्जानला अटक केली. बुधवारी सज्जानचा ताबा नाशिक रोड पोलिसांना दिला जाणार असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त पडसलगीकर यांनी सांगितले.
वडाळा येथील अॅड. पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला वॉचमन सज्जाद मुघल हा आठ महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर गेला आणि त्यानंतर कारागृहात परत आलाच नाही. तो फरार झाला. त्यामुळे राज्य सरकारने बलात्कार, खून, दरोडा यासह इतर गंभीर प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला यापुढे फर्लो किंवा पॅरोल मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. परिणामी, पल्लवी खून प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले.
सज्जानला पकडण्यासाठी काश्मिरी वेश
सज्जान हा खूपच हुशार होता. स्वतःची ओळख पटू नये.यासाठी त्याने केश आणि दाढी देखील वाढवली होती. पोलिस नेहमीच्या वेशात त्या समोर किंवा आसपास गेले असते, तर त्याने लगेच त्यांना ओळखले असते. त्यामुळे सज्जानची माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी ही काश्मिरी पेहरावा करत, स्वतःची दाढी आणि केश वाढवले होते.