म. टा. प्रतिनिधी
मुंबई - सर्वांसाठी लोकल सुरू होत नसल्याने, आधी निषेध मग आंदोलन करण्याचा निर्णय प्रवासी संघटनेने घेतला आहे. 'सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून हजारो प्रवासी सरकारचा आगळ्या पद्धतीने निषेध करणार आहेत.
लोकल ट्रेन नसल्यामुळे एमएमआरमधील शेतकरी आणि दूधविक्रेत्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. रस्तेमार्गे मुंबई-ठाण्यात दूधविक्री करण्यासाठी रोजचा ३०० ते ५०० रुपये अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे दूधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. प्रवाशांना लोकलचा पर्याय नसल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडी वाढत असल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढेल, यासाठी सरकारने सामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. दरम्यान बाजारात, तसेच एसटी-बेस्टमध्ये गर्दी मात्र वाढत आहे. यामुळे सामान्यांच्या लोकलप्रवासावर बंदी लादण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कसारा-आसनगाव-टिटवाळा तसेच कर्जत-बदलापूर-अंबरनाथ येथील शेतकरी-दूधविक्रेत्यांना तबेल्यातील दूध शहरी भागात पोहचवण्यासाठी रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. ४० लिटरचे ५-६ कॅन दुचाकीला लावून अनेकजण पहाटेच शहरात येतात. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी नादुरुस्त होत आहेत, अपघात होत आहेत. शिवाय खर्च वाढतो तो वेगळाच. हा खर्च वसूल करण्यासाठी दुध दरात प्रति लिटर १-२ रुपये वाढ करावी लागते. एरव्ही लोकलच्या मालडब्यातून शहरी भागात दूध पोहोचविण्याचे काम करण्यात येत होते, असे कसारा परिसरातील दूधविक्रेत्यांनी सांगितले. आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू झाली नाही, तर प्रवाशांच्या संतापाला राज्य सरकार जबाबदार असेल. लोकल प्रवासासाठी सामान्यांनी आंदोलन किंवा रेल रोको केल्यानंतरच सरकार परवानगी देणार का? असा प्रश्न प्रवासी महासंघाने उपस्थित केला आहे.
'सर्वांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच प्रवासी महासंघाने आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याला प्रवासी संघटनेचा पाठिंबा आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई - सर्वांसाठी लोकल सुरू होत नसल्याने, आधी निषेध मग आंदोलन करण्याचा निर्णय प्रवासी संघटनेने घेतला आहे. 'सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून हजारो प्रवासी सरकारचा आगळ्या पद्धतीने निषेध करणार आहेत.
लोकल ट्रेन नसल्यामुळे एमएमआरमधील शेतकरी आणि दूधविक्रेत्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. रस्तेमार्गे मुंबई-ठाण्यात दूधविक्री करण्यासाठी रोजचा ३०० ते ५०० रुपये अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे दूधविक्रेत्यांचे म्हणणे आहे. प्रवाशांना लोकलचा पर्याय नसल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडी वाढत असल्याने प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग वाढेल, यासाठी सरकारने सामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. दरम्यान बाजारात, तसेच एसटी-बेस्टमध्ये गर्दी मात्र वाढत आहे. यामुळे सामान्यांच्या लोकलप्रवासावर बंदी लादण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
कसारा-आसनगाव-टिटवाळा तसेच कर्जत-बदलापूर-अंबरनाथ येथील शेतकरी-दूधविक्रेत्यांना तबेल्यातील दूध शहरी भागात पोहचवण्यासाठी रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. ४० लिटरचे ५-६ कॅन दुचाकीला लावून अनेकजण पहाटेच शहरात येतात. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी नादुरुस्त होत आहेत, अपघात होत आहेत. शिवाय खर्च वाढतो तो वेगळाच. हा खर्च वसूल करण्यासाठी दुध दरात प्रति लिटर १-२ रुपये वाढ करावी लागते. एरव्ही लोकलच्या मालडब्यातून शहरी भागात दूध पोहोचविण्याचे काम करण्यात येत होते, असे कसारा परिसरातील दूधविक्रेत्यांनी सांगितले. आठ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू झाली नाही, तर प्रवाशांच्या संतापाला राज्य सरकार जबाबदार असेल. लोकल प्रवासासाठी सामान्यांनी आंदोलन किंवा रेल रोको केल्यानंतरच सरकार परवानगी देणार का? असा प्रश्न प्रवासी महासंघाने उपस्थित केला आहे.
'सर्वांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच प्रवासी महासंघाने आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याला प्रवासी संघटनेचा पाठिंबा आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.