म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईकरांसाठी शनिवारचा दिवस हा एखाद्या तापत्या भट्टीमध्ये काम केल्यासारखा ठरला आहे. मार्चमधील तापलेल्या पाऱ्याचा यंदाच्या मोसमातील आत्तापर्यंतचा उच्चांक शनिवारी गाठला. सांताक्रूझ आणि कुलाबा दोन्ही ठिकाणी तापमान सरासरीहून खूप अधिक होते. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४०.९, तर कुलाबा येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापमान हे गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते.
सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्यानंतर शनिवारच्या कमाल तापमानाने २.४ अंशांची उसळी घेतली. कुलाबा येथेही शुक्रवारच्या ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानावरून शनिवारी ३८ अंशांपर्यंत पारा पोहोचला. दिवसभरात आर्द्रतेचे प्रमाणही कमी असल्याने घामाचे प्रमाण कमी होते. मात्र त्याचमुळे भाजून निघाल्याचीही जाणीव होती. मुंबईमध्ये इतर वेळी उन्हाळ्यात आर्द्रता असल्याने घाम येऊन शरीराचे तापमान कायम राखले जाते. मात्र शनिवारी २४ टक्के आर्द्रता नोंदली गेली. त्यामुळे शुष्क, गरम झळांचे प्रमाण अधिक होते. वातावरणात ही उष्णता दीर्घकाळ साचून राहिली होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतरही वातावरणातील ही उष्णता मुंबईकरांनी अनुभवली. आत्तापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान मार्चमध्ये सन १९५६ मध्ये नोंदले गेले आहे. हे तापमान ४१.७ अंश सेल्सिअस होते. या आधी सन २०१८ मध्ये मार्च महिन्यात पारा ४१ अंशांपर्यंत, तर सन २०११ मध्ये ४१.३ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र गेले काही दिवस सतत पारा चढा असल्याने मुंबईकरांना यंदा मार्चमध्ये झालेला हा त्रास अधिक प्रमाणात जाणवला.
मुंबईकरांसाठी शनिवारचा दिवस हा एखाद्या तापत्या भट्टीमध्ये काम केल्यासारखा ठरला आहे. मार्चमधील तापलेल्या पाऱ्याचा यंदाच्या मोसमातील आत्तापर्यंतचा उच्चांक शनिवारी गाठला. सांताक्रूझ आणि कुलाबा दोन्ही ठिकाणी तापमान सरासरीहून खूप अधिक होते. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ४०.९, तर कुलाबा येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापमान हे गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान होते.
सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३८.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. त्यानंतर शनिवारच्या कमाल तापमानाने २.४ अंशांची उसळी घेतली. कुलाबा येथेही शुक्रवारच्या ३५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानावरून शनिवारी ३८ अंशांपर्यंत पारा पोहोचला. दिवसभरात आर्द्रतेचे प्रमाणही कमी असल्याने घामाचे प्रमाण कमी होते. मात्र त्याचमुळे भाजून निघाल्याचीही जाणीव होती. मुंबईमध्ये इतर वेळी उन्हाळ्यात आर्द्रता असल्याने घाम येऊन शरीराचे तापमान कायम राखले जाते. मात्र शनिवारी २४ टक्के आर्द्रता नोंदली गेली. त्यामुळे शुष्क, गरम झळांचे प्रमाण अधिक होते. वातावरणात ही उष्णता दीर्घकाळ साचून राहिली होती. संध्याकाळी सूर्यास्तानंतरही वातावरणातील ही उष्णता मुंबईकरांनी अनुभवली. आत्तापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान मार्चमध्ये सन १९५६ मध्ये नोंदले गेले आहे. हे तापमान ४१.७ अंश सेल्सिअस होते. या आधी सन २०१८ मध्ये मार्च महिन्यात पारा ४१ अंशांपर्यंत, तर सन २०११ मध्ये ४१.३ अंशांपर्यंत पोहोचला होता. मात्र गेले काही दिवस सतत पारा चढा असल्याने मुंबईकरांना यंदा मार्चमध्ये झालेला हा त्रास अधिक प्रमाणात जाणवला.