मिठी नदीबाबत उपाययोजना करण्याचे सरकारचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविणे तसेच अधिकृत बांधकामातील रहिवाशांचे स्थलांतर करणे यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, तसेच नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिठी नदी व मुंबईतील इतर नद्यांच्या प्रदूषणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांनी मिठी नदीबाबत झालेल्या कामांचा आढावा घेतला व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मिठी नदीच्या परिसरातील ६ किमी अंतरातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे काम हे ‘एमएमआरडीए’कडे, तर ११ किमी अंतरातील काम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येते. मात्र, अपूर्णावस्थेत असलेले काम तातडीने पूर्ण करावे, नदीतील गाळ काढण्यासंदर्भातील कामाचा अहवाल सादर करावा, ६७ छोट्या भागांतून प्रदूषित
पाणी नदीत सोडले जाते, त्यावर उपाययोजना आखण्यासंदर्भातील अहवालही त्वरित सादर करावा, असे आदेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सांडपाणी प्रक्रियेबाबत नियम
मिठी नदी परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून व वसाहतीतून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नियम आखण्यात येणार आहेत. या क्षेत्रात किती झाडे लावता येतील, यासंदर्भातही सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कदम यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
१५ दिवसांत योजना
महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी पूर्ण केलेल्या कामाची माहिती देऊन, उर्वरित अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासंदर्भातील योजना पुढील १५ दिवसांत सादर करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मिठी नदी परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविणे तसेच अधिकृत बांधकामातील रहिवाशांचे स्थलांतर करणे यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, तसेच नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात व त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी दिले.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मिठी नदी व मुंबईतील इतर नद्यांच्या प्रदूषणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कदम यांनी मिठी नदीबाबत झालेल्या कामांचा आढावा घेतला व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मिठी नदीच्या परिसरातील ६ किमी अंतरातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे काम हे ‘एमएमआरडीए’कडे, तर ११ किमी अंतरातील काम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येते. मात्र, अपूर्णावस्थेत असलेले काम तातडीने पूर्ण करावे, नदीतील गाळ काढण्यासंदर्भातील कामाचा अहवाल सादर करावा, ६७ छोट्या भागांतून प्रदूषित
पाणी नदीत सोडले जाते, त्यावर उपाययोजना आखण्यासंदर्भातील अहवालही त्वरित सादर करावा, असे आदेश कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सांडपाणी प्रक्रियेबाबत नियम
मिठी नदी परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून व वसाहतीतून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नियम आखण्यात येणार आहेत. या क्षेत्रात किती झाडे लावता येतील, यासंदर्भातही सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कदम यांनी संबंधितांना दिल्या आहेत.
१५ दिवसांत योजना
महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी पूर्ण केलेल्या कामाची माहिती देऊन, उर्वरित अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासंदर्भातील योजना पुढील १५ दिवसांत सादर करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.