मोनोची वाट बिकट
मुंबई : पहिल्या टप्प्यात डबघाईला आलेल्या मोनो रेल्वेची सर्व मदार आता वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या मार्गावर आहे. पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यात मिळून दररोज एक लाख प्रवासी व उत्पन्नात पाच पटीने वाढ अपेक्षित असून हा पल्ला गाठला तरच मोनोचा दिमाख वाढेल.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नफ्याची अपेक्षा ठेवली जात नाही. मात्र प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असावा आणि आर्थिक तोटा झालाच, तर तो किमान स्वरूपात असावा, असे अपेक्षित असते. परंतु या दोन्ही निकषांवर मोनोची कामगिरी निराशाजनकच आहे. प्रवाशांच्या प्रतिसादाबद्दल तर आनंदी आनंदच आहे. चेंबूर व भारत पेट्रोलियम ही दोन स्थानके वगळता अन्य पाच स्थानकांवर दिवसभरात जेमतेम हजारभर प्रवासी हजेरी लावतात. चेंबूर आणि भारत पेट्रोलियम या दोन स्थानकात प्रवासी संख्या अनुक्रमे सहा हजार व पाच हजार आहे. प्रवाशांचा असा अल्प प्रतिसाद आणि तिकिट दर अवघे पाचे ते ११ रुपये असताना मोनोला घसघशीत महसूल मिळणे अशक्यच आहे.
अपेक्षा दुसऱ्या टप्प्याकडून
मोनोचा दुसरा टप्पा चेंबूर ते जेकब सर्कल असा आहे. या मार्गात दादर, नायगाव, वडाळा ब्रिज, जीटीबी नगर, अँटॉप हिल, परळ हे गजबजलेले भाग येतात. दुसऱ्या टप्प्यातील एकूण १७ स्थानकांपैकी ही प्रमुख स्थानके आहेत. त्यामुळे दोन्ही टप्प्यांत मिळून एक लाख प्रवासी, तर ५४ कोटी रुपये तिकीट विक्रीतून अपेक्षित आहेत.
तिकिट दरात वाढ?
मोनोचा महसूल वाढवायचा असेल तर तिकिट दरात काही प्रमाणात का होईना वाढ होणे गरजेचे आहे. सध्याचे भाडे अनुक्रमे पाच, सात, नऊ आणि ११ रुपये असे नाममात्र आहे. मोनोच्या तिकिटदरात वाढ अपेक्षित होती. परंतु आधीच प्रवासी संख्या अपुरी आणि त्यात भाडेवाढ केल्यास आणखीनच बिकट स्थिती ओढावेल या भावनेमुळे भाढेवाढ करण्यास एमएमआरडीए धजावत नसल्याचे समजते. मात्र दुसरा टप्पा यशस्वी झाला तर मात्र दरवाढीला आडकाठी असणार नाही.
पहिल्या टप्प्यातील कामगिरी
० पहिल्या टप्प्यातील कामगिरी
-दिवसाला १६ हजार प्रवासी
-महिना उत्पन्न ३४ लाख
- प्रतिवर्षी उत्पन्न ३.७५ कोटी
-महिन्याचा तोटा सुमारे ८० लाख
०दुसऱ्या टप्प्याकडून अपेक्षा
- एक लाख प्रवासी
- दरमहा उत्पन्न ४.५ कोटी
- प्रतिवर्षी उत्पन्न ५४ कोटी
‘नो प्रोफिट नॉ लॉस’साठी काय करावे लागेल-
एक लाख प्रवासी १५ रुपये तिकीट... रोज १५ लाख उत्पन्न महिन्याला ४.५ कोटी. वर्षाला ५४ कोटी. म्हणजे ३.७५ कोटीवरून उत्पन्न ५४ कोटींवर जाईल.
अर्थकारण रूळावर- रोज १६००० प्रवासी
सध्याचे तिकिट दर – पाच, सात, नऊ, ११ वरून १० १५ २० २५ होणे आवश्यक आहे.
सरासरी १५ रु.
सध्या चेंबूरची प्रवासी संख्या सहा हजार आहे, तर भारत पेट्रोलियमची प्रावसी संख्या पाच हजार आहे. अन्य पाच स्टेशनवरील प्रवासी संख्या एक हजाराच्या आसपास आहे. या एकूण स्थानके सात
दुसऱ्या टप्प्यात १७ स्थानके. भारत पेट्रोलियम, जीटीबी, अँटोप, वडाळा बिज, दादर, नायगाव परळ.. एकूण १ लाख प्रवासी होतील. चेंबूरची प्रवासीसंख्या सहावरून आठ हजार होण्याची अपेक्षा आहे.
(क्रमश :)
मुंबई : पहिल्या टप्प्यात डबघाईला आलेल्या मोनो रेल्वेची सर्व मदार आता वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या मार्गावर आहे. पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यात मिळून दररोज एक लाख प्रवासी व उत्पन्नात पाच पटीने वाढ अपेक्षित असून हा पल्ला गाठला तरच मोनोचा दिमाख वाढेल.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत नफ्याची अपेक्षा ठेवली जात नाही. मात्र प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असावा आणि आर्थिक तोटा झालाच, तर तो किमान स्वरूपात असावा, असे अपेक्षित असते. परंतु या दोन्ही निकषांवर मोनोची कामगिरी निराशाजनकच आहे. प्रवाशांच्या प्रतिसादाबद्दल तर आनंदी आनंदच आहे. चेंबूर व भारत पेट्रोलियम ही दोन स्थानके वगळता अन्य पाच स्थानकांवर दिवसभरात जेमतेम हजारभर प्रवासी हजेरी लावतात. चेंबूर आणि भारत पेट्रोलियम या दोन स्थानकात प्रवासी संख्या अनुक्रमे सहा हजार व पाच हजार आहे. प्रवाशांचा असा अल्प प्रतिसाद आणि तिकिट दर अवघे पाचे ते ११ रुपये असताना मोनोला घसघशीत महसूल मिळणे अशक्यच आहे.
अपेक्षा दुसऱ्या टप्प्याकडून
मोनोचा दुसरा टप्पा चेंबूर ते जेकब सर्कल असा आहे. या मार्गात दादर, नायगाव, वडाळा ब्रिज, जीटीबी नगर, अँटॉप हिल, परळ हे गजबजलेले भाग येतात. दुसऱ्या टप्प्यातील एकूण १७ स्थानकांपैकी ही प्रमुख स्थानके आहेत. त्यामुळे दोन्ही टप्प्यांत मिळून एक लाख प्रवासी, तर ५४ कोटी रुपये तिकीट विक्रीतून अपेक्षित आहेत.
तिकिट दरात वाढ?
मोनोचा महसूल वाढवायचा असेल तर तिकिट दरात काही प्रमाणात का होईना वाढ होणे गरजेचे आहे. सध्याचे भाडे अनुक्रमे पाच, सात, नऊ आणि ११ रुपये असे नाममात्र आहे. मोनोच्या तिकिटदरात वाढ अपेक्षित होती. परंतु आधीच प्रवासी संख्या अपुरी आणि त्यात भाडेवाढ केल्यास आणखीनच बिकट स्थिती ओढावेल या भावनेमुळे भाढेवाढ करण्यास एमएमआरडीए धजावत नसल्याचे समजते. मात्र दुसरा टप्पा यशस्वी झाला तर मात्र दरवाढीला आडकाठी असणार नाही.
पहिल्या टप्प्यातील कामगिरी
० पहिल्या टप्प्यातील कामगिरी
-दिवसाला १६ हजार प्रवासी
-महिना उत्पन्न ३४ लाख
- प्रतिवर्षी उत्पन्न ३.७५ कोटी
-महिन्याचा तोटा सुमारे ८० लाख
०दुसऱ्या टप्प्याकडून अपेक्षा
- एक लाख प्रवासी
- दरमहा उत्पन्न ४.५ कोटी
- प्रतिवर्षी उत्पन्न ५४ कोटी
‘नो प्रोफिट नॉ लॉस’साठी काय करावे लागेल-
एक लाख प्रवासी १५ रुपये तिकीट... रोज १५ लाख उत्पन्न महिन्याला ४.५ कोटी. वर्षाला ५४ कोटी. म्हणजे ३.७५ कोटीवरून उत्पन्न ५४ कोटींवर जाईल.
अर्थकारण रूळावर- रोज १६००० प्रवासी
सध्याचे तिकिट दर – पाच, सात, नऊ, ११ वरून १० १५ २० २५ होणे आवश्यक आहे.
सरासरी १५ रु.
सध्या चेंबूरची प्रवासी संख्या सहा हजार आहे, तर भारत पेट्रोलियमची प्रावसी संख्या पाच हजार आहे. अन्य पाच स्टेशनवरील प्रवासी संख्या एक हजाराच्या आसपास आहे. या एकूण स्थानके सात
दुसऱ्या टप्प्यात १७ स्थानके. भारत पेट्रोलियम, जीटीबी, अँटोप, वडाळा बिज, दादर, नायगाव परळ.. एकूण १ लाख प्रवासी होतील. चेंबूरची प्रवासीसंख्या सहावरून आठ हजार होण्याची अपेक्षा आहे.
(क्रमश :)