म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस योग्य पद्धतीने काम करत आहेत, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली. मुंबई पोलिसांचा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. त्यामुळे ते योग्य प्रकारे तपास करीत आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून, ते तपासात हलगर्जी करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप असून, त्यामुळेच या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधक राजकारण करत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, सुशांत याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केला. तर दुसरीकडे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी झाली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, केंद्राने हा तपास सीबीआयकडे देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री देशमुख यांना विचारले असता, सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस चांगल्या पद्धतीने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारची या प्रकरणातील पुढील भूमिका काय आहे, असे देशमुख यांना विचारले असताही त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. 'सुशांत प्रकरणात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत', असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस योग्य पद्धतीने काम करत आहेत, अशी ग्वाही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी दिली. मुंबई पोलिसांचा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. त्यामुळे ते योग्य प्रकारे तपास करीत आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
सुशांत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून, ते तपासात हलगर्जी करत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा भाजपचा आरोप असून, त्यामुळेच या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधक राजकारण करत असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, सुशांत याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केला. तर दुसरीकडे हा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी झाली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून, केंद्राने हा तपास सीबीआयकडे देण्याबाबत अनुकूलता दर्शविली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री देशमुख यांना विचारले असता, सुशांत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस चांगल्या पद्धतीने तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारची या प्रकरणातील पुढील भूमिका काय आहे, असे देशमुख यांना विचारले असताही त्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत समाधान व्यक्त केले. 'सुशांत प्रकरणात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत', असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.