मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत मोर्चा काढून जमाव बंदी मोडल्याच्या कारणावरून आजच्या मोर्चावर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याचा आरोपही मनसेच्या मोर्चावर ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील एल्फिन्स्टन रोड ब्रिजवरील चेंगराचेंगरीत मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज संताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील प्रसिद्ध मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन रेल्वे प्रशासनाला सादर केलं. यावेळी चर्चगेट स्टेशनजवळ राज ठाकरे यांनी ट्रकवर उभं राहून उपस्थितांना संबोधित केलं.
आजच्या मोर्चातील भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना येत्या १५ दिवसांत हटविण्यात यावे अशी मागणी करताना, ही कारवाई न केल्यास १६व्या दिवशी मनसे स्टाइलने फेरीवाल्यांना हटविण्यात येईल असा इशाराही राज ठाकरे यांनी आज दिला. #Mumbai police register case against MNS leaders under sec 37(1) E & 135 of Maharashtra police Act for organizing Morcha without permission — ANI (@ANI) October 5, 2017
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईत मोर्चा काढून जमाव बंदी मोडल्याच्या कारणावरून आजच्या मोर्चावर गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याचा आरोपही मनसेच्या मोर्चावर ठेवण्यात आला आहे.
मुंबईतील एल्फिन्स्टन रोड ब्रिजवरील चेंगराचेंगरीत मुंबईकरांना आपले प्राण गमवावे लागल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज संताप मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील प्रसिद्ध मेट्रो सिनेमा ते चर्चगेट असा मोर्चा काढून राज ठाकरे यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन रेल्वे प्रशासनाला सादर केलं. यावेळी चर्चगेट स्टेशनजवळ राज ठाकरे यांनी ट्रकवर उभं राहून उपस्थितांना संबोधित केलं.
आजच्या मोर्चातील भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले. रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना येत्या १५ दिवसांत हटविण्यात यावे अशी मागणी करताना, ही कारवाई न केल्यास १६व्या दिवशी मनसे स्टाइलने फेरीवाल्यांना हटविण्यात येईल असा इशाराही राज ठाकरे यांनी आज दिला. #Mumbai police register case against MNS leaders under sec 37(1) E & 135 of Maharashtra police Act for organizing Morcha without permission — ANI (@ANI) October 5, 2017