अ‍ॅपशहर

आयुक्तांचा 'बेस्ट' निर्णय; मुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये

Mumbai Latest News : जून महिन्यापासून मुंबई पोलिसांचे पगार वाढवण्यात आले आहेत. मात्र, या वाढलेल्या पगारानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये तिकीट काढूनच प्रवास करता येणार आहे. यासंबंधी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माहिती दिली आहे.

Authored byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jun 2022, 3:05 pm
मुंबई : मुंबई पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जूनपासून मुंबईतील पोलिसांचे पगार २७०० ते ५२०० रुपयांपर्यंत वाढले आहे. मात्र, या वाढलेल्या पगारानंतर आता पोलीस कर्मचाऱ्यांना बेस्टमध्ये तिकीट काढूनच प्रवास करता येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस विभागात आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai police
मुंबई पोलीस


एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल ते एएसआयचा २७०० ते ३२०० रुपये पगार दरमहा बेस्टच्या खात्यात जायचा. इतकंच नाहीतर पीएसआय ते एसीपी यांचा ४८०० ते ५२०० रुपयांपर्यंतचा पगार हा बेस्टच्या खात्यात जायचा. त्या बदल्यात पोलिसांना बेस्टच्या बसमधून शहरभर मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

Mumbai Covid Cases Today : महाराष्ट्रात वेगाने वाढतोय करोना, मुंबईतली ११ ठिकाणं ठरली हॉटस्पॉट
दरम्यान, अनेक पोलिसांनी याविरोधात तक्रारी केल्या की, ते लोकल ट्रेनमधून प्रवास करतात किंवा त्यांच्याकडे खाजगी वाहने आहेत. त्यामुळे फार कमी लोक सरकारी किंवा वैयक्तिक कामासाठी बेस्टच्या बसमध्ये जातात. यामुळे त्यांच्या पगारातील बेस्टचा हिस्सा त्यांना दिला तर बरं होईल. यावरच पोलिस आयुक्तांनी आढावा घेऊन त्यानंतर नवा आदेश जारी केला आहे.

घाट अन् बैलगाडा स्पर्धा भाजपची, हवा मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराची; VIDEO व्हायरल
आधी किती रक्कम कापली जायची?

या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपूर्वी पोलीस कल्याण निधीतून पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी पैसे बेस्टला पाठवले जातचे. नंतर पोलिसांच्या खात्यातून ५० ते १०० रुपयांपर्यंत रक्कम कापली जाऊ लागली. हळूहळू रक्कम ५२०० रुपयांपर्यंत पोहोचली. पण यानंतर बेस्टमध्ये फुकट प्रवासाच्या नावाखाली आपले खूप पैसे बुडत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी याविरोधात तक्रारी केल्या. यानंतर अखेर पोलिस आयुक्तांनाही यावर योग्य निर्णय दिला आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज