म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
गीतरामायणाचे शब्द आणि सूर कधी जुने होणार नाहीत. त्याचे उपजत वैभव पुढच्या पिढ्याही त्यांच्या परीने नक्की जपतील. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही गीतरामायण सादर केले आहे. त्यामुळे हा इतिहास नव्याने घडवला जाईल. या गीतरामायणाची रचना अजरामर करणाऱ्या गदिमा आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके या दोघांचेही यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त दोन्ही ज्येष्ठ आणि अतुलनीय कलाकारांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेला 'गीतरामायण' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी ग. दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांना मानवंदना म्हणून एका रेल्वेला 'गीतांजली एक्स्प्रेस' नाव देण्यात आले. याच पद्धतीने महाराष्ट्रानेही गदिमा, बाबुजी आणि गीतरामायण या अलौकिक कृतीच्या स्मृती जपाव्यात अशी इच्छा माडगूळकर कुटुंबीयांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. गीतरामायणाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त डिसेंबर २०१५ रोजी सुमित्र यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्या ट्विटला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष १८ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्यानिमित्त पुण्यामध्ये त्यांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचसोबत स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ जुलैपासून सुरू होत आहे. यानिमित्त मुंबई-पुणेदरम्यान ही 'गीतरामायण एक्स्प्रेस' धावावी असे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात पुढील महिन्यात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही विनंती करणार आहेत. यासाठी वेगळ्या गाडीची तरतूद गरजेची नसल्याने यात फार अडचणी येणे अपेक्षित नाही. नामकरण एवढाच तांत्रिक मुद्दा यामध्ये आहे.
या गाडीमध्ये नागरिकांना गीतरामायणाची अजरामर गाणी ऐकता यावीत. गदिमा आणि बाबुजींचे विविध फोटो आत असावेत, गीतरामायणासंदर्भातील चित्रे असावीत अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. गीतरामायणाचे अधिकार माडगूळकर कुटुंबीयांकडेच असल्याने त्यासंदर्भातही अडचण येणार नाही, असेही सुमित्र यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सुधीर फडके यांचा मुलगा आणि लोकप्रिय गायक-संगीतकार श्रीधर फडके यांनी गीतरामायण एक्स्प्रेस सुरू झाल्यास आनंदच होईल, असे मत व्यक्त केले.
...
बाबुजींच्या स्मारकासाठी प्रयत्न
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात गदिमांचे आणि मुंबईत बाबुजींचे स्मारक व्हावे असा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी श्रीधर फडके पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईत या स्मारकासाठी वेगळी जागा नको, यामध्ये बाबुजींचा पुतळाही नको असे श्रीधर यांनी स्पष्ट केले आहे. त्याऐवजी संगीत जपणारे एखादे संग्रहालय व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गीतरामायणाचे शब्द आणि सूर कधी जुने होणार नाहीत. त्याचे उपजत वैभव पुढच्या पिढ्याही त्यांच्या परीने नक्की जपतील. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही गीतरामायण सादर केले आहे. त्यामुळे हा इतिहास नव्याने घडवला जाईल. या गीतरामायणाची रचना अजरामर करणाऱ्या गदिमा आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके या दोघांचेही यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त दोन्ही ज्येष्ठ आणि अतुलनीय कलाकारांच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात यासाठी मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या रेल्वेला 'गीतरामायण' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी ग. दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांना मानवंदना म्हणून एका रेल्वेला 'गीतांजली एक्स्प्रेस' नाव देण्यात आले. याच पद्धतीने महाराष्ट्रानेही गदिमा, बाबुजी आणि गीतरामायण या अलौकिक कृतीच्या स्मृती जपाव्यात अशी इच्छा माडगूळकर कुटुंबीयांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे. गीतरामायणाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त डिसेंबर २०१५ रोजी सुमित्र यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून ही इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्या ट्विटला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र गदिमांचे जन्मशताब्दी वर्ष १८ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्यानिमित्त पुण्यामध्ये त्यांचे स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याचसोबत स्वरतीर्थ सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष २५ जुलैपासून सुरू होत आहे. यानिमित्त मुंबई-पुणेदरम्यान ही 'गीतरामायण एक्स्प्रेस' धावावी असे मत त्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात पुढील महिन्यात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही विनंती करणार आहेत. यासाठी वेगळ्या गाडीची तरतूद गरजेची नसल्याने यात फार अडचणी येणे अपेक्षित नाही. नामकरण एवढाच तांत्रिक मुद्दा यामध्ये आहे.
या गाडीमध्ये नागरिकांना गीतरामायणाची अजरामर गाणी ऐकता यावीत. गदिमा आणि बाबुजींचे विविध फोटो आत असावेत, गीतरामायणासंदर्भातील चित्रे असावीत अशी कल्पना त्यांनी मांडली आहे. गीतरामायणाचे अधिकार माडगूळकर कुटुंबीयांकडेच असल्याने त्यासंदर्भातही अडचण येणार नाही, असेही सुमित्र यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात सुधीर फडके यांचा मुलगा आणि लोकप्रिय गायक-संगीतकार श्रीधर फडके यांनी गीतरामायण एक्स्प्रेस सुरू झाल्यास आनंदच होईल, असे मत व्यक्त केले.
...
बाबुजींच्या स्मारकासाठी प्रयत्न
जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यात गदिमांचे आणि मुंबईत बाबुजींचे स्मारक व्हावे असा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी श्रीधर फडके पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबईत या स्मारकासाठी वेगळी जागा नको, यामध्ये बाबुजींचा पुतळाही नको असे श्रीधर यांनी स्पष्ट केले आहे. त्याऐवजी संगीत जपणारे एखादे संग्रहालय व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.