मुंबई: रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या 'रेल रोको' आंदोलनाचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला जाब विचारला. त्यावर, 'आंदोलकांकडून दगडफेक झाल्यामुळं नाइलाजास्तव पोलिसांना लाठीमार करावा लागला,' असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
रेल्वे सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आज सकाळी मध्य रेल्वेवरील दादर ते माटुंगा स्थानकादरम्यान 'रेल रोको' केला. त्यामुळं मध्य रेल्वेची लांब पल्ल्याची तसंच, लोकल वाहतूक सुमारे चार तास ठप्प होती. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीमार केला. तर, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात काही अधिकाऱ्यांसह एकूण ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले.
विधानसभेत आंदोलकांवरील लाठीमाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर निवेदन देताना दगडफेक झाल्यानं लाठीमार करावा लागला, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.
रेल्वे सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आज सकाळी मध्य रेल्वेवरील दादर ते माटुंगा स्थानकादरम्यान 'रेल रोको' केला. त्यामुळं मध्य रेल्वेची लांब पल्ल्याची तसंच, लोकल वाहतूक सुमारे चार तास ठप्प होती. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांवर लाठीमार केला. तर, आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात काही अधिकाऱ्यांसह एकूण ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले.
विधानसभेत आंदोलकांवरील लाठीमाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर निवेदन देताना दगडफेक झाल्यानं लाठीमार करावा लागला, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.