म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेवर येणारा ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यावर विचार सुरू आहे. यासाठी एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केली.
सह्याद्री अतिथीगृहात चिपळूण ते कराड रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी शापूरजी पालोनजी कंपनी आणि कोकण रेल्वेमध्ये सामजंस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रभू बोलत होते. मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज ७५ ते ८० लाख नागरिक प्रवास करतात. एवढ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन यापूर्वी झालेले नाही. १५ ते २० वर्षांपूर्वीच मेट्रोचे जाळे उभारण्याची गरज होती. आता शहरात मेट्रोचे काम सुरू झाले असले तरी त्यासाठी आणखी चार वर्षे लागतील. त्यामुळे कार्यालयीन कामाचे तास बदलण्यासाठी खास अभ्यासगटाची स्थापणा करण्यात येणार असून खाजगी क्षेत्रानेही त्यासाठी आम्हाला मदत करावा’, असे ते म्हणाले.
को.रे.चे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि शापूरजी पालोनजीचे एस. मुकुंदन यांच्यात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी सामंजस्य करारावर सह्या झाल्या. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रत्नागिरीचे पालकमंत्री विजय शिवतरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री रवींद्र वायकर, विनायक राऊत, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, आशीष शेलार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
पायाभूत विकास निधी
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विकासाची जी दरी होती, ती चिपळूण-कराड या १०३ किमीच्या नव्या रेल्वे मार्गामुळे मिटणार आहे. ७२० किमीचा समुद्र किनारा कोकणात आहे. रेल्वे मार्गाने बंदरे जोडण्याबरोबरच विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांवर बोजा टाकण्याऐवजी सरकारी निधी वापरून व पीपीपी मॉडेलमार्फत खासगी क्षेत्राची मदत घेतली जात आहे. मुंबईत एक लाख कोटीचे मेट्रोप्रकल्प हाती घेतले आहेत. रेल्वे पायाभूत विकास निधी उभारण्याचा प्रयत्न असून त्यासाठी जागतिक बँकेचे मदत घेतली जाणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
लोकल ताणावर वेळबदलाचा उतारा
रस्त्यापेक्षा रेल्वेने विकास लवकर पोहोचतो. त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वा ठरणार आहे. प्रवाशांच्या वेळेच्या बचतीसह रोजगार आणि व्यापारही वाढणार आहे. त्यामुळे चर्चगेर्ट-विरार आणि सीएसटी-पनवेल रेल्वे आणि रस्ता असा दुहेरी प्रकल्प अहवाल १५ ऑगस्टच्या आधीच तयार झाले आहेत. त्यापैकी एकास निती आयोगाने मान्यताही दिली असून, दुसरा मान्यतेच्या वाटेवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
असा होणारा चिपळूण-कराड मार्ग
प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३१९५.६० कोटी
n प्रकल्पाची लांबी १०३ किमी
n ४६ किमी मार्ग बोगद्यातून जाणार असल्याने वृक्षतोड टळणार
n १६ मोठे बोगदे, तर सर्वांत मोठा बोगदा ८ किमीचा
n ५८ पुलांची निर्मिती
n चिपळूण ते कराड हे ४२५ किमीचे रस्ते अंतर वाचणार
n विहळे, मुंढे, कोयना रोड, पाठण, शेडगेवाडी आणि खोडाशी या रेल्वे स्थानकांचा समावेश• रत्नागिरीच्या ३७ किमी, तर सातारा येथील ६६ किमी भागाशी संपर्क
सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वेवर येणारा ताण कमी करण्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलण्यावर विचार सुरू आहे. यासाठी एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवारी केली.
सह्याद्री अतिथीगृहात चिपळूण ते कराड रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी शापूरजी पालोनजी कंपनी आणि कोकण रेल्वेमध्ये सामजंस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रभू बोलत होते. मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज ७५ ते ८० लाख नागरिक प्रवास करतात. एवढ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार वाहतुकीचे नियोजन यापूर्वी झालेले नाही. १५ ते २० वर्षांपूर्वीच मेट्रोचे जाळे उभारण्याची गरज होती. आता शहरात मेट्रोचे काम सुरू झाले असले तरी त्यासाठी आणखी चार वर्षे लागतील. त्यामुळे कार्यालयीन कामाचे तास बदलण्यासाठी खास अभ्यासगटाची स्थापणा करण्यात येणार असून खाजगी क्षेत्रानेही त्यासाठी आम्हाला मदत करावा’, असे ते म्हणाले.
को.रे.चे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि शापूरजी पालोनजीचे एस. मुकुंदन यांच्यात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या बांधणीसाठी सामंजस्य करारावर सह्या झाल्या. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, रत्नागिरीचे पालकमंत्री विजय शिवतरे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री रवींद्र वायकर, विनायक राऊत, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार राहुल नार्वेकर, आशीष शेलार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
पायाभूत विकास निधी
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विकासाची जी दरी होती, ती चिपळूण-कराड या १०३ किमीच्या नव्या रेल्वे मार्गामुळे मिटणार आहे. ७२० किमीचा समुद्र किनारा कोकणात आहे. रेल्वे मार्गाने बंदरे जोडण्याबरोबरच विदर्भ-मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांवर बोजा टाकण्याऐवजी सरकारी निधी वापरून व पीपीपी मॉडेलमार्फत खासगी क्षेत्राची मदत घेतली जात आहे. मुंबईत एक लाख कोटीचे मेट्रोप्रकल्प हाती घेतले आहेत. रेल्वे पायाभूत विकास निधी उभारण्याचा प्रयत्न असून त्यासाठी जागतिक बँकेचे मदत घेतली जाणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
लोकल ताणावर वेळबदलाचा उतारा
रस्त्यापेक्षा रेल्वेने विकास लवकर पोहोचतो. त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी हा मार्ग महत्त्वा ठरणार आहे. प्रवाशांच्या वेळेच्या बचतीसह रोजगार आणि व्यापारही वाढणार आहे. त्यामुळे चर्चगेर्ट-विरार आणि सीएसटी-पनवेल रेल्वे आणि रस्ता असा दुहेरी प्रकल्प अहवाल १५ ऑगस्टच्या आधीच तयार झाले आहेत. त्यापैकी एकास निती आयोगाने मान्यताही दिली असून, दुसरा मान्यतेच्या वाटेवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
असा होणारा चिपळूण-कराड मार्ग
प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३१९५.६० कोटी
n प्रकल्पाची लांबी १०३ किमी
n ४६ किमी मार्ग बोगद्यातून जाणार असल्याने वृक्षतोड टळणार
n १६ मोठे बोगदे, तर सर्वांत मोठा बोगदा ८ किमीचा
n ५८ पुलांची निर्मिती
n चिपळूण ते कराड हे ४२५ किमीचे रस्ते अंतर वाचणार
n विहळे, मुंढे, कोयना रोड, पाठण, शेडगेवाडी आणि खोडाशी या रेल्वे स्थानकांचा समावेश• रत्नागिरीच्या ३७ किमी, तर सातारा येथील ६६ किमी भागाशी संपर्क