मुंबईः
मान्सूनच्या पहिल्याच सरींनी मुंबईला झोडपून काढलं आहे. यामुळे रेल्वे सेवाही काही प्रमाणात विस्कळीत झाली. मुंबईत सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मान्सूनने महाराष्ट्राचा ७० टक्के भाग व्यापला आहे. राज्याच्या बहुतांश भागात उद्या जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. हिंदमाता, परळ भागात पाणी तुंबले. मुंबईत अद्यापही पावसाची संततधार सुरूच आहे. मुलुंड, कुर्ला, घाटकोपर या उपनगरांमध्ये ७५.६६ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरांमध्ये २७ मिमी इतका पाऊस पडला.
रेल्वे सेवा विस्कळीत पण वाहतूक सुरू...
मुंबईत १०० मिमी पाऊस होऊनही रेल्वे सेवा सुरू होती. पण शीव, कुर्ला, सँडहर्स्ट रोड आणि विक्रोळी- कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्यांची वाहतूक मंदावली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या संध्याकाळपर्यंत १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्ये रेल्वेवरी उद्याचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवरचाही उद्याचा मेगाब्लॉक रद्द केला गेला आहे.
मान्सूनच्या पहिल्याच सरींनी मुंबईला झोडपून काढलं आहे. यामुळे रेल्वे सेवाही काही प्रमाणात विस्कळीत झाली. मुंबईत सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मान्सूनने महाराष्ट्राचा ७० टक्के भाग व्यापला आहे. राज्याच्या बहुतांश भागात उद्या जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. हिंदमाता, परळ भागात पाणी तुंबले. मुंबईत अद्यापही पावसाची संततधार सुरूच आहे. मुलुंड, कुर्ला, घाटकोपर या उपनगरांमध्ये ७५.६६ मिमी पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरांमध्ये २७ मिमी इतका पाऊस पडला.
रेल्वे सेवा विस्कळीत पण वाहतूक सुरू...
मुंबईत १०० मिमी पाऊस होऊनही रेल्वे सेवा सुरू होती. पण शीव, कुर्ला, सँडहर्स्ट रोड आणि विक्रोळी- कांजुरमार्ग दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्यांची वाहतूक मंदावली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या संध्याकाळपर्यंत १५ ते २० मिनिटं उशिराने धावत होत्या. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मध्ये रेल्वेवरी उद्याचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक कायम ठेवण्यात आला आहे. तर पश्चिम रेल्वेवरचाही उद्याचा मेगाब्लॉक रद्द केला गेला आहे.