अ‍ॅपशहर

आता हॉटेले २४ तास सुरू

मुंबईतील निवासी भागातील दुकाने, हॉटेले, पब, क्लब, रेस्तराँ २४ तास सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात येणार नाही. मात्र, व्यावसायिक विभागातील हॉटेले, पब, क्लब, रेस्तराँ अशा आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्यासंदर्भात परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले.

Maharashtra Times 11 Aug 2017, 4:48 am
आस्थापना विधेयक विधानसभेत मंजूर; निवासी भागात मात्र परवानगी नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai shops theatres may remain open 247 soon
आता हॉटेले २४ तास सुरू


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील निवासी भागातील दुकाने, हॉटेले, पब, क्लब, रेस्तराँ २४ तास सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात येणार नाही. मात्र, व्यावसायिक विभागातील हॉटेले, पब, क्लब, रेस्तराँ अशा आस्थापनांना २४ तास सुरू ठेवण्यासंदर्भात परवानगी दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले. मुंबई आस्थापना विधेयक गुरुवारी रात्री विधानसभेत मंजूर झाले.

मुंबईतील दुकाने, निवासी हॉटेले, उपाहारगृहे, थिएटर तसेच पब व अन्य सार्वजनिक मनोरंजनाच्या जागा येथील कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीसंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडले. मुंबईतील दुकाने, हॉटेले, थिएटर तसेच इतर आस्थापने २४ तास खुली ठेवता येतील. दुकाने २४ तास सुरू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या, कामाची वेळ तसेच कर्मचाऱ्यांच्या सुविधा यासंदर्भातील तरतुदी विधेयकात आहेत. निवासी भागात मात्र २४ दुकाने, हॉटेल सुरू ठेवली तर नागरिक त्रस्त होतील, असा मुद्दा आशीष शेलार यांनी मांडला तेव्हा निवासी भागात अशा आस्थापने २४ सुरू ठेवण्यास परवानगी देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मध्यरात्रीपासून सुरू होणारा २४ तासांचा कालावधी आस्थापनांसाठी गृहित धरण्यात आला आहे. दहापेक्षा कमी कर्मचारी काम करीत असणाऱ्या प्रत्येक आस्थापनाच्या मालकाला धंदा सुरू केल्यापासून ६० दिवसात ऑनलाइन अर्ज करावा लागेल. तसेच दुकाने, व्यापारी संकुल उघडण्याचा किंवा बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला राहणार आहे.


तरतुदी

> कोणत्याही कर्मचाऱ्याला नऊ तासांपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडता येणार नाही.

> कर्मचाऱ्यांकडून पाच तासांपेक्षा अधिक सलग तास काम करून घेता येणार नाही.

> कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सुट्टी देणे बंधनकारक.

> महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनात भेदभाव करता येणार नाही.

> महिलांना सकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या व्यतिरिक्त इतर वेळी काम करण्यास भाग पाडता येणार नाही.

> रात्री साडेनऊ नंतर महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमतीने थांबवायचे झाल्यास महिलांचे संरक्षण तसेच त्यांना निवासस्थानापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था करावी लागेल.

> अटींचा भंग केला तर मालकाला एक लाख रुपये दंड व शिक्षा होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज