मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
यंदाच्या पावसात पहिल्याच दिवशी विस्कळीत झालेली मुंबईची ‘लाइफ लाइन’ आज पुन्हा एकदा कोलमडली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून शनिवारी सकाळपासूनच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे.
मुंबई-ठाणे परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच शुक्रवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे रेल्वेमार्गावर काही ठिकाणी पाणी साचले, तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे रखडल्या. उपनगरीय गाड्यांची वाहतूक उशिराने होत असल्याचा फटका चाकरमान्यांना बसला. मात्र तांत्रिक बिघाड दूर करून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
येत्या २४ तासांत मुसळधार
येत्या २४ तासात मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून आज पहाटेपर्यंत मुंबई शहरात ७३ मिमी, पश्चिम उपनगरात ७४.४३ मिमी, तर पूर्व उपनगरात १०७.७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शनिवार, रविवारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण समुद्र किनाऱ्यावर जातात. अशा वेळी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यंदाच्या पावसात पहिल्याच दिवशी विस्कळीत झालेली मुंबईची ‘लाइफ लाइन’ आज पुन्हा एकदा कोलमडली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका लोकल सेवेला बसला असून शनिवारी सकाळपासूनच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिरानं सुरू आहे.
मुंबई-ठाणे परिसरात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. तसेच शुक्रवारी रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे रेल्वेमार्गावर काही ठिकाणी पाणी साचले, तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वे रखडल्या. उपनगरीय गाड्यांची वाहतूक उशिराने होत असल्याचा फटका चाकरमान्यांना बसला. मात्र तांत्रिक बिघाड दूर करून लवकरच रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्यात येईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
येत्या २४ तासांत मुसळधार
येत्या २४ तासात मुंबई आणि कोकण किनारपट्टी परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून आज पहाटेपर्यंत मुंबई शहरात ७३ मिमी, पश्चिम उपनगरात ७४.४३ मिमी, तर पूर्व उपनगरात १०७.७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शनिवार, रविवारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण समुद्र किनाऱ्यावर जातात. अशा वेळी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.