अ‍ॅपशहर

मुंबई आणि परिसरात पावसाचा शिडकावा

येत्या तीन दिवसांत राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून आज पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसाचा शिडकावा झाला. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि कोकण आणि गोव्यात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2019, 10:53 am
मुंबई: येत्या तीन दिवसांत राज्यात गारठा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून आज पहाटे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पावसाचा शिडकावा झाला. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि कोकण आणि गोव्यात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबईत पावसाचा शिडकावा


उत्तर भारतातील अनेक शहरांमधील किमान तापमान ६ अंशाखाली उतरले असून आता महाराष्ट्रातही थंडीचे आगमन होईल असे सांगितले जात आहे. पंजाब, हरयाणाबरोबरच उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये थंड वारे वाहणे सुरू झाले आहे. पुढील ३ दिवसांत राज्यातही गारठा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. विदर्भात थंडीचे आगमन होणार असून, त्यानंतर मराठवाडा आणि इतर ठिकाणी थंडी वाढेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे झाली आहे. उस्मानाबादेत १५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. या बरोबरच अहमदनगर, महाबळेश्वर, अमरावती, गोंदिया, नागपूर आणि वाशिममध्ये देखील तापमानात घट झाल्याची नोंद आहे.

बुधवारी असे होते चित्र

अहमदनगर- १५.४ अंश सेल्सिअस
महाबळेश्वर- १५.४ अंश सेल्सिअस
गोंदिया- १५.४ अंश सेल्सिअस
नागपूर- १६.१ अंश सेल्सिअस
वाशिम- १६.४ अंश सेल्सिअस
अमरावती १६.६ अंश सेल्सिअस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज