अ‍ॅपशहर

'या' कारणामुळे टोमॅटो सप्टेंबरपर्यंत महागच

तीस ते चाळीस रुपये किलोने मिळणारे लालबुंद टोमॅटो आता बाजारातून नाहीसे झाले आहेत. किरकोळ दर्जाच्या टोमॅटोंच्या दरांनीही आता शंभरी पार केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत टोमॅटोचे हे दर चढे राहण्याची शक्यता आहे.

शर्मिला कलगुटकर | Maharashtra Times 22 Jul 2017, 4:01 am
मुंबई : तीस ते चाळीस रुपये किलोने मिळणारे लालबुंद टोमॅटो आता बाजारातून नाहीसे झाले आहेत. किरकोळ दर्जाच्या टोमॅटोंच्या दरांनीही आता शंभरी पार केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत टोमॅटोचे हे दर चढे राहण्याची शक्यता आहे. ‘टोस्पो’ विषाणूची लागण झाल्यामुळे तसेच काही ठिकाणी या विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे टोमॅटोचे उन्हाळी पीकच न घेतल्यामुळे टोमॅटोचे उत्पादन साफ कोसळले आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या एकूण पुरवठ्यावर होऊन टोमॅटोने शंभरीच्या पार उसळी मारली आहे. महागडे टोमॅटो विकत घेण्यापेक्षा त्याची कसर लिंबू, कोकम, चिंच या इतर आंबट पर्यायांवर गृहिणींनी भरून काढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai tomatoes to be costly till september
'या' कारणामुळे टोमॅटो सप्टेंबरपर्यंत महागच


महाराष्ट्रात टोमॅटोचे लागवड क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर इतके आहे. सांगली, सातारा, नारायणगाव, जुन्नर, बीडमधील काही भागांमध्येही उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र वाढत्या उष्म्यामध्ये टोस्पो या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. लागवडीनंतर पिकावर ४५ दिवसांनी हा विषाणूचा प्रभाव दिसून येत असल्याने त्यावर नियंत्रण कसे आाणायचे या प्रश्नानेही टोमॅटो उत्पादकांना हैराण केले आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या धास्तीमुळे महाराष्ट्रात ज्या भागातून सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन मिळते तेथील यंदा लागवडीचे क्षेत्र ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मुंबईला होणारा साधारणतः पाच ते सहा हजार मेट्रिक टन इतका टोमॅटोचा पुरवठा ७० टक्क्यांनी कमी झाला आहे.

मेन्यूकार्डवरून होणार पावभाजी, सॅन्डवीच गुल

टोमॅटो, भाज्यांचे चढे दर उतरत नसल्यामुळे पावभाजी, सॅन्डवीच या पदार्थांना काही दिवसांसाठी मेन्यूकार्डमधून काढून टाकण्याचा निर्णय ‘आहार’ या हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने घेतला आहे. जीएसटीमुळे हॉटेल उद्योजक आधीच चिंतेत असताना या वाढीव दरांमुळे पदार्थांच्या किमती वाढवतानाही विचार करावा लागतो. त्याऐवजी सरळ हे पदार्थच मेन्यूलिस्टमधून काढून टाकण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात येणार असल्याचे ‘आहार’चे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी ‘मटा’ला सांगितले.

नाशिकचा टोमॅटो देईल दिलासा

नागपंचमीला प्रत्येक वर्षी नाशिकमध्ये टोमॅटोच्या लागवडीची सुरुवात होते, त्यानंतर ९० ते ११० दिवसांनी टोमॅटो आल्यानंतर मुंबईच्या बाजारात पुरवठा सुरळीत सुरू झाला की किंमती कमी होतील, अशी शक्यता अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक महासंघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी व्यक्त केली.

एपीएमसीमध्येही आवक घटली

उत्पादन कमी असल्यामुळे नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारामध्येही टोमॅटोची आवक घटली आहे. रोज चाळीस ते पन्नास गाड्या येथे येतात, त्यात अंदाजे नऊ टन टोमॅटो असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून हे प्रमाण निम्म्याने खाली आले आहे. आज मार्केटमध्ये वीस गाड्यांची आवक झाली. टोमॅटोचे उत्पादन वाढत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहील अशी शक्यता एपीएमसी मार्केटमधील घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुनील मांढरे यांनी दिली.

टोमॅटो उत्पादक ‘टोस्पो’मुळे हैराण

महाराष्ट्रात टोमॅटोचे लागवड क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर इतके आहे. सांगली, सातारा, नारायणगाव, जुन्नर, बीडमधील काही भागांमध्येही उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र वाढत्या उष्म्यामध्ये टोस्पो या विषाणूची लागण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. लागवडीनंतर पिकावर ४५ दिवसांनी हा विषाणूचा प्रभाव दिसून येत असल्याने त्यावर नियंत्रण कसे आणायचे या प्रश्नानेही उत्पादकांना हैराण केले आहे. या संसर्गाच्या धास्तीमुळे महाराष्ट्रात ज्या भागातून सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन मिळते तेथील यंदा लागवडीचे क्षेत्र ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटले आहे. त्यामुळे मुंबईला होणारा साधारणतः पाच ते सहा हजार मेट्रिक टन इतका टोमॅटोचा पुरवठा ७० टक्क्यांनी कमी झाला आहे.

पीकसंरक्षणतज्ज्ञ संतोष सहाने म्हणाले की, गेल्या वर्षीपेक्षा विषाणू संसर्ग काही ठिकाणी कमी असला तरीही उन्हाळ्यात धास्तीने शेतक‍ऱ्यांनी पीक घेतलेच नाही. त्यामुळे उत्पादनाला फटका बसला. नोटाबंदी आणि शेतक‍ऱ्यांच्या आंदोलनाच्या काळाचाही विपरित परिणाम भाज्यांसह टोमॅटोलागवडीवर झाला आहे. त्यात या विषाणूजन्य संसर्गाची भर पडली. कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो म्हणून दोन वर्षांपूर्वी कांद्याचेही उत्पादन खो‍ऱ्याने घेण्यात आले. उन्हाळ्यात, पावसाळ्यात आलेल्या या पिकांवरही टोमॅटोनंतर ‘टोस्पो’ने मोर्चा वळवला. मुबलक उत्पादकता असल्याने संसर्ग वेगात वाढत गेला. ज्या नैसर्गिक फवारणीचा वापर करून विषाणू नियंत्रित केले जातात, त्यांची मात्राही चालेनाशी झाली.’
लेखकाबद्दल
शर्मिला कलगुटकर
शर्मिला कलगुटकर या महाराष्ट्र टाइम्स च्या मुंबई आवृत्तीमध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. त्यांना पत्रकारितेमध्ये २१ वर्षाचा अनुभव आहे. त्या आरोग्य, सामाजिक, जेंडर अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्यापूर्ण लिखाण आणि वार्तांकन करतात. आरोग्यक्षेत्रातील अनेक गैरप्रकारांना त्यांनी शोधपत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. या कार्याची दखल घेत त्यांना पत्रकारितेतील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज