उद्धव ठाकरे यांचा आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरावर दलालांचा डोळा आहे. त्यासाठी कामगारांना मुंबईत मिळालेली घरे विकायला लावून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा या दलालांचा डाव आहे,’ असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी वरळी येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी उद्धव बोलत होते. ‘बरीच वर्षे खस्ता खाल्ल्यानंतर व अनेक आंदोलनांनंतर गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळत आहेत. पण त्या घरांवर दलालांचा डोळा आहे. म्हाडा किंवा इतर माध्यमातून कामगारांना मुंबईत मिळालेली घरे विकण्यासाठी दलालांनी त्यांच्यामागे तगादा लावला आहे. गिरणी कामगारांना या दलालांना थारा देऊ नये. शिवसेना या दलालांचा बंदोबस्त करण्यास समर्थ आहे,’ असे उद्धव यांनी सांगितले.
‘संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची संख्या १०७ पेक्षा दुपटीने अधिक आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा शाळेत शिकवायला हवा,’ असे मतही उद्धव यांनी मांडले. शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच अत्रे समितीचे सचिव अरविंद भोसले यावेळी उपस्थित होते.
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
‘गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरावर दलालांचा डोळा आहे. त्यासाठी कामगारांना मुंबईत मिळालेली घरे विकायला लावून मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्याचा या दलालांचा डाव आहे,’ असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी वरळी येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी उद्धव बोलत होते. ‘बरीच वर्षे खस्ता खाल्ल्यानंतर व अनेक आंदोलनांनंतर गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळत आहेत. पण त्या घरांवर दलालांचा डोळा आहे. म्हाडा किंवा इतर माध्यमातून कामगारांना मुंबईत मिळालेली घरे विकण्यासाठी दलालांनी त्यांच्यामागे तगादा लावला आहे. गिरणी कामगारांना या दलालांना थारा देऊ नये. शिवसेना या दलालांचा बंदोबस्त करण्यास समर्थ आहे,’ असे उद्धव यांनी सांगितले.
‘संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची संख्या १०७ पेक्षा दुपटीने अधिक आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचा लढा शाळेत शिकवायला हवा,’ असे मतही उद्धव यांनी मांडले. शिक्षण मंत्री विनोद तावडे तसेच अत्रे समितीचे सचिव अरविंद भोसले यावेळी उपस्थित होते.