अ‍ॅपशहर

​ निकालप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल दरबारी

विद्यापीठात सुरू असलेल्या निकालप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काही दिवसांपूर्वी एक दिवसीय उपोषण केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुक्रवारी थेट राजभवन गाठले.

Maharashtra Times 16 Sep 2017, 4:01 am
मुंबई ः विद्यापीठात सुरू असलेल्या निकालप्रश्नी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काही दिवसांपूर्वी एक दिवसीय उपोषण केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शुक्रवारी थेट राजभवन गाठले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेण्यात आली असून निकाल गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai university result delay ncp reaches governor
​ निकालप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल दरबारी


मुंबई विद्यापीठाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भेटीवेळी राष्ट्रवादीचे विधानसभा गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर आणि विद्यार्थी काँग्रेसचे अॅड. अमोल मातेले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एकूण १४ मागण्यांचे एक निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे. डॉ. संजय देशमुख यांचा राजीनामा घेऊन विद्यापीठाच्या कोणत्याही विभागाशी संबंधित न ठेवता त्यांच्यावर त्वरीत कार्यवाही करून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर निकालासाठी पूर्णपणे नवीन व्यवस्था निर्माण केल्याशिवाय अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळता येणार नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रमाण फारच विषम असल्याने व विविध कॉलेजमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी कली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज