म. टा. प्रतिनिधी, मुंबई
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकाल गोंधळामुळे बऱ्याच कॉलेजांमधील अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तर दुसरीकडे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे तसेच नियमानुसार ९० दिवसांचे अध्ययन दिवस पूर्ण करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर उभे राहिले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॉलेजांमध्ये ‘मेक अप क्लासेस’ची संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून अभ्यासक्रम आणि ९० दिवसांची अट पूर्ण करण्यासाठी विशेष लेक्चर आयोजित केली जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा निकाल गोंधळ सोडविण्याच्या कामी सध्या प्राध्यापक वर्ग गुंतला आहे. निकालाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असले, तरी आगामी परीक्षांचे आव्हान विद्यापीठाला पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचारी संघटनांची नुकतीच एक बैठक घेतली. विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त ‘मेक अप क्लासेस’ संकल्पना राबविण्याची सूचना प्राध्यापकांनी केली.
यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ९० दिवसांचे अध्ययन दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु निकाल गोंधळामुळे प्राध्यापकांचा बराच वेळ पेपर तपासणीसाठी गेल्याने काही कॉलेजांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात भर म्हणजे, विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ‘मेक अप क्लासेस’ राबविण्याची मागणी केल्याचे ‘मुक्टा’ संघटनेचे वैभव नरवडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या समन्वयाने त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भात लवकरच सर्व कॉलेजांना परिपत्रक पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकाल गोंधळामुळे बऱ्याच कॉलेजांमधील अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेले नाहीत. तर दुसरीकडे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे तसेच नियमानुसार ९० दिवसांचे अध्ययन दिवस पूर्ण करण्याचे आव्हान प्राध्यापकांसमोर उभे राहिले आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी कॉलेजांमध्ये ‘मेक अप क्लासेस’ची संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून अभ्यासक्रम आणि ९० दिवसांची अट पूर्ण करण्यासाठी विशेष लेक्चर आयोजित केली जाणार आहेत.
मुंबई विद्यापीठाचा निकाल गोंधळ सोडविण्याच्या कामी सध्या प्राध्यापक वर्ग गुंतला आहे. निकालाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असले, तरी आगामी परीक्षांचे आव्हान विद्यापीठाला पेलावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचारी संघटनांची नुकतीच एक बैठक घेतली. विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त ‘मेक अप क्लासेस’ संकल्पना राबविण्याची सूचना प्राध्यापकांनी केली.
यूजीसीच्या नियमानुसार विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी ९० दिवसांचे अध्ययन दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. परंतु निकाल गोंधळामुळे प्राध्यापकांचा बराच वेळ पेपर तपासणीसाठी गेल्याने काही कॉलेजांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यात भर म्हणजे, विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ‘मेक अप क्लासेस’ राबविण्याची मागणी केल्याचे ‘मुक्टा’ संघटनेचे वैभव नरवडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या समन्वयाने त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. यासंदर्भात लवकरच सर्व कॉलेजांना परिपत्रक पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.