मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
'गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर पुढील ४८ तास असाच कायम राहील,' असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबई व उपनगरात २१ सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होईल आणि हळूहळू जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता. तो खरा ठरला असून पुढील २४ ते ४८ तासांतही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर सर्वाधिक राहील,' असं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव राजीव निवतकर यांनी सांगितलं. मुंबईबरोबरच कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहील,' असंही ते म्हणाले.
आंध्रच्या किनारपट्टीवर आणि मुंबईजवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे व पालघरमध्ये पावसाचा जोर वाढण्यावर होईल, असं त्यांनी सांगितलं.
'गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर पुढील ४८ तास असाच कायम राहील,' असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मुंबई व उपनगरात २१ सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होईल आणि हळूहळू जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला होता. तो खरा ठरला असून पुढील २४ ते ४८ तासांतही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर सर्वाधिक राहील,' असं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव राजीव निवतकर यांनी सांगितलं. मुंबईबरोबरच कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातही २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर राहील,' असंही ते म्हणाले.
आंध्रच्या किनारपट्टीवर आणि मुंबईजवळच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचा परिणाम मुंबई, ठाणे व पालघरमध्ये पावसाचा जोर वाढण्यावर होईल, असं त्यांनी सांगितलं.