म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
दोन दिवसांपूर्वी पावसाचा तडाखा अनुभवल्यानंतर मुंबईत शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे वातावरणात गारठा जाणवला आणि दुपारच्या वेळी मात्र उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे या ऋतूला काय म्हणायचे, हेच मुंबईकरांना कळत नाही. थंडी अद्याप सुरूही झाली नसली तरी तामपानाचा पारा राज्यभरात खाली उतरला आहे.
सोमवारीही आभाळ अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सध्या वारे पूर्व ते ईशान्य पट्ट्यातून वाहत आहेत, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. थंडीसाठी उत्तरेकडून वारे वाहण्याची प्रतीक्षा आहे. उत्तर भारतामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील काही ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने गारठ्याची जाणीव होऊ लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वायव्य भारत आणि त्यालगतच्या मध्य भारतामध्ये किमान तापमान दोन ते चार अंशांनी खाली घसरण्याची शक्यता असल्याचे पूर्वानुमान भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा नोव्हेंबरच्या सरासरीच्या अजूनही बराच वर आहे. मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी तापमान अधिक आहे. मात्र किमान तापमानाचा पारा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे २० अंशांच्या आसपास आहे. तर कमाल तापमान ३० ते ३२ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.५ अंश नोंदवले गेले.
धुरक्याचे अस्तित्व
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक रविवारी समाधानकारक होता. पावसाळी हवेमुळे वातावरणातील प्रदूषके वाहून नेली गेली, तरी आता धुरक्याचे अस्तित्व जाणवू लागले आहे. आता येत्या काळामध्ये थंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावण्याचा अंदाज आहे.
दोन दिवसांपूर्वी पावसाचा तडाखा अनुभवल्यानंतर मुंबईत शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे वातावरणात गारठा जाणवला आणि दुपारच्या वेळी मात्र उन्हाचा ताप जाणवत आहे. त्यामुळे या ऋतूला काय म्हणायचे, हेच मुंबईकरांना कळत नाही. थंडी अद्याप सुरूही झाली नसली तरी तामपानाचा पारा राज्यभरात खाली उतरला आहे.
सोमवारीही आभाळ अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सध्या वारे पूर्व ते ईशान्य पट्ट्यातून वाहत आहेत, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली. थंडीसाठी उत्तरेकडून वारे वाहण्याची प्रतीक्षा आहे. उत्तर भारतामध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील काही ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने गारठ्याची जाणीव होऊ लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये वायव्य भारत आणि त्यालगतच्या मध्य भारतामध्ये किमान तापमान दोन ते चार अंशांनी खाली घसरण्याची शक्यता असल्याचे पूर्वानुमान भारतीय हवामान विभागाने वर्तवले आहे.
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा नोव्हेंबरच्या सरासरीच्या अजूनही बराच वर आहे. मालेगाव येथे सर्वाधिक म्हणजे सरासरीपेक्षा ५.१ अंशांनी तापमान अधिक आहे. मात्र किमान तापमानाचा पारा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे २० अंशांच्या आसपास आहे. तर कमाल तापमान ३० ते ३२ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये कमाल आणि किमान तापमानामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १५.५ अंश नोंदवले गेले.
धुरक्याचे अस्तित्व
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक रविवारी समाधानकारक होता. पावसाळी हवेमुळे वातावरणातील प्रदूषके वाहून नेली गेली, तरी आता धुरक्याचे अस्तित्व जाणवू लागले आहे. आता येत्या काळामध्ये थंडीमुळे हवेची गुणवत्ता खालावण्याचा अंदाज आहे.