मुंबई : यापुढे लग्न झाल्यानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना त्यांचे पासपोर्टवरील नाव बदलण्याची आवश्यकता नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली. इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या मेळाव्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना मोदी बोलत होते. पासपोर्ट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, आता महिलांना लग्नाचे किंवा घटस्फोटाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. पासपोर्टवर महिलांना वडिलांचे किंवा आईचे नाव लावता येईल, असे मोदी म्हणाले.
विवाहितांना माहेरच्या नावानेही पासपोर्ट
यापुढे लग्न झाल्यानंतर किंवा घटस्फोटानंतर महिलांना त्यांचे पासपोर्टवरील नाव बदलण्याची आवश्यकता नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केली.
Maharashtra Times 14 Apr 2017, 4:01 am