म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
बेस्ट उपक्रमाची झालेली दुर्दशा, कामगारांचे होणारे हाल, प्रवाशांच्या हालअपेष्टा अशा परिस्थितीत जानेवारीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलेले संपास मुंबईकरांनी मानवतेच्या दृष्टीने एकमुखी पाठिंबा दिला. मात्र, आता मुंबई पालिकेने दिलेल्या सढळ मदतीने बेस्ट उपक्रम सुस्थितीत येत असतानाही कर्मचारी पुन्हा संपाचा घाट घालत असल्याबद्दल मुंबईकर संतप्त झाले आहेत. बेस्ट कामगारांना वेळेत पगार मिळण्यासह अन्य मागण्यांना मुंबईकरांचा पाठिंबा आहे. पण, सणासुदीच्या वा इतर कोणत्याही कालावधीत मुंबईकरांना वेठीस धरून संप पुकारणे अयोग्य असल्याची टीका मुंबईकरांकडून केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या मदतीमुळे बेस्ट उपक्रमावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होत चालला आहे. मुंबई पालिकेने बेस्टला यापूर्वी बसखरेदीसाठी ६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. जोडीला कर्ज फेडण्यासाठी १,१३६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून त्यातील ६६५ कोटी रुपये दिलेही आहेत. त्यातील ५३१ कोटीच्या रकमेने कर्ज परतफेडीसाठी हातभार लागला आहे. या रकमेने बेस्टला कर्जावरील व्याजापोटी द्याव्या लागणाऱ्या वार्षिक ५२ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
एकीकडे बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांनी संपूर्ण पाठिंबा दिला असतानाच पालिकेनेही तिकीट दर कमी करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे बेस्ट प्रवास स्वस्त होऊन प्रवासी संख्या वाढली. या स्थितीत बेस्ट सक्षम होण्यासाठीच्या प्रयत्नांत सहभागी होण्याऐवजी संपावर जाण्याचा आग्रह निरर्थक असल्याची मुंबईकरांची प्रतिक्रिया आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही त्या निर्णयावर टीका केली असून, 'संस्था जगली तरच आपण जगू हे बेस्ट कर्मचाऱ्यांनी विसरू नये', असा सल्ला दिला आहे.
मुंबईकरांचे हाल करू नका
गेल्या काही दिवसांपासून बेस्ट संपाविषयीच्या चर्चांनी मुंबईकर त्रस्त आहेत. गणेशोत्सव जवळ आला असताना संपाचा इशारा देणे किती संयुक्तिक आहे, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. पालिकेकडून सहकार्य लाभत असताना बेस्ट कामगार संघटनांनी मुंबईकरांचे हाल करू नये, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रवाशांचे मुद्दे...
-पालिका देतेय आर्थिक मदत
-५३१ कोटींचे कर्जही फेडले
-सणासुदीत प्रवाशांना झळ नको
बेस्ट उपक्रमाची झालेली दुर्दशा, कामगारांचे होणारे हाल, प्रवाशांच्या हालअपेष्टा अशा परिस्थितीत जानेवारीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांनी केलेले संपास मुंबईकरांनी मानवतेच्या दृष्टीने एकमुखी पाठिंबा दिला. मात्र, आता मुंबई पालिकेने दिलेल्या सढळ मदतीने बेस्ट उपक्रम सुस्थितीत येत असतानाही कर्मचारी पुन्हा संपाचा घाट घालत असल्याबद्दल मुंबईकर संतप्त झाले आहेत. बेस्ट कामगारांना वेळेत पगार मिळण्यासह अन्य मागण्यांना मुंबईकरांचा पाठिंबा आहे. पण, सणासुदीच्या वा इतर कोणत्याही कालावधीत मुंबईकरांना वेठीस धरून संप पुकारणे अयोग्य असल्याची टीका मुंबईकरांकडून केली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या मदतीमुळे बेस्ट उपक्रमावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होत चालला आहे. मुंबई पालिकेने बेस्टला यापूर्वी बसखरेदीसाठी ६०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. जोडीला कर्ज फेडण्यासाठी १,१३६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असून त्यातील ६६५ कोटी रुपये दिलेही आहेत. त्यातील ५३१ कोटीच्या रकमेने कर्ज परतफेडीसाठी हातभार लागला आहे. या रकमेने बेस्टला कर्जावरील व्याजापोटी द्याव्या लागणाऱ्या वार्षिक ५२ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
एकीकडे बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांनी संपूर्ण पाठिंबा दिला असतानाच पालिकेनेही तिकीट दर कमी करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे बेस्ट प्रवास स्वस्त होऊन प्रवासी संख्या वाढली. या स्थितीत बेस्ट सक्षम होण्यासाठीच्या प्रयत्नांत सहभागी होण्याऐवजी संपावर जाण्याचा आग्रह निरर्थक असल्याची मुंबईकरांची प्रतिक्रिया आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनीही त्या निर्णयावर टीका केली असून, 'संस्था जगली तरच आपण जगू हे बेस्ट कर्मचाऱ्यांनी विसरू नये', असा सल्ला दिला आहे.
मुंबईकरांचे हाल करू नका
गेल्या काही दिवसांपासून बेस्ट संपाविषयीच्या चर्चांनी मुंबईकर त्रस्त आहेत. गणेशोत्सव जवळ आला असताना संपाचा इशारा देणे किती संयुक्तिक आहे, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. पालिकेकडून सहकार्य लाभत असताना बेस्ट कामगार संघटनांनी मुंबईकरांचे हाल करू नये, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रवाशांचे मुद्दे...
-पालिका देतेय आर्थिक मदत
-५३१ कोटींचे कर्जही फेडले
-सणासुदीत प्रवाशांना झळ नको