म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मुंबईमध्ये गेल्या काही दिवासांपासून अॅलर्जी टेस्टचे पेव फुटले आहे. विविध प्रकारच्या वासांची, रंगाची, अन्नाची अलर्जी आहे का, हे तपासून घ्या, असे अनेक लॅबकडून सांगण्यात येते. गरज नसताना हा रुग्णांच्या खिशातून पैसे उकळण्याचा हा प्रकार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषानुसार जगामध्ये विविध प्रकारच्या अॅलर्जीची तपासणी ही त्वचेवर घेतली जाते. त्यासाठी रक्तचाचणीला प्राधान्य दिले जात नाही. नव्या तंत्रज्ञानामध्ये हजारो रुपये घेऊन करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये अतिरिक्त पैसे उकळले जातात. ५० ते ६० हजार रुपयापर्यंतचे दर या चाचण्यांसाठी घेतले जात आहेत त्यामुळे या चाचण्यांची खरच गरज आहे का, असा प्रश्न अॅलर्जी या विषयांमध्ये प्रावीण्य असलेल्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
कोणतीही शहानिशा न करता अनेक मुंबईकर लॅबमध्ये जाऊन थेट या चाचण्या करतात त्यांची गरज नसते. डॉक्टर 'या चाचण्या करा,' असे स्पष्ट सांगत नाही, तोपर्यंत त्या परस्पर करू नये. त्वचेवर यापूर्वी केल्या जाणाऱ्या चाचण्या सुरक्षित होत्या, सीरम पद्धतीमध्ये काही वेळा औषधांची रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे या चाचण्या सावधगिरीने केल्या पाहिजेत. पैसे उकळण्यासाठी एका वेळी दहा ते बारा चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये अनेक अन्नघटकांची अॅलर्जी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अॅलर्जीची निर्माण करणारे आहारातील हे घटक बंद करून टाकतात. त्यामुळे विविध प्रकारच्या पोषण मूल्यांची कमतरता निर्माण होऊन त्यातून थकवा येणे, हिमोग्लोबिन कमी होणे यासारखे आजार उद्भवतात, असे अॅलर्जी या विषयातील तज्ज्ञ डॉ. सीतेश रॉय यांनी स्पष्ट केले.
अनेक रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या या सकारात्मक असल्याचा आभास निर्माण करतात. चाचणीपूर्वी देण्यात आलेल्या औषधांमुळेही असे होऊ शकते. त्यात तथ्य असतेच असे नाही, वाढते प्रदूषण, बदलती हवा, अन्नात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांमधून अॅलर्जी होण्याचे प्रमाण वाढते असले तरीही ती कायमस्वरूपाची आहे का, याचीही चाचपणी करायला हवी. या चाचण्या करणे गैर नसले तरीही त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्हायला हव्या, असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. विकास पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवासांपासून अॅलर्जी टेस्टचे पेव फुटले आहे. विविध प्रकारच्या वासांची, रंगाची, अन्नाची अलर्जी आहे का, हे तपासून घ्या, असे अनेक लॅबकडून सांगण्यात येते. गरज नसताना हा रुग्णांच्या खिशातून पैसे उकळण्याचा हा प्रकार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषानुसार जगामध्ये विविध प्रकारच्या अॅलर्जीची तपासणी ही त्वचेवर घेतली जाते. त्यासाठी रक्तचाचणीला प्राधान्य दिले जात नाही. नव्या तंत्रज्ञानामध्ये हजारो रुपये घेऊन करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये अतिरिक्त पैसे उकळले जातात. ५० ते ६० हजार रुपयापर्यंतचे दर या चाचण्यांसाठी घेतले जात आहेत त्यामुळे या चाचण्यांची खरच गरज आहे का, असा प्रश्न अॅलर्जी या विषयांमध्ये प्रावीण्य असलेल्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.
कोणतीही शहानिशा न करता अनेक मुंबईकर लॅबमध्ये जाऊन थेट या चाचण्या करतात त्यांची गरज नसते. डॉक्टर 'या चाचण्या करा,' असे स्पष्ट सांगत नाही, तोपर्यंत त्या परस्पर करू नये. त्वचेवर यापूर्वी केल्या जाणाऱ्या चाचण्या सुरक्षित होत्या, सीरम पद्धतीमध्ये काही वेळा औषधांची रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे या चाचण्या सावधगिरीने केल्या पाहिजेत. पैसे उकळण्यासाठी एका वेळी दहा ते बारा चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये अनेक अन्नघटकांची अॅलर्जी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अॅलर्जीची निर्माण करणारे आहारातील हे घटक बंद करून टाकतात. त्यामुळे विविध प्रकारच्या पोषण मूल्यांची कमतरता निर्माण होऊन त्यातून थकवा येणे, हिमोग्लोबिन कमी होणे यासारखे आजार उद्भवतात, असे अॅलर्जी या विषयातील तज्ज्ञ डॉ. सीतेश रॉय यांनी स्पष्ट केले.
अनेक रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या या सकारात्मक असल्याचा आभास निर्माण करतात. चाचणीपूर्वी देण्यात आलेल्या औषधांमुळेही असे होऊ शकते. त्यात तथ्य असतेच असे नाही, वाढते प्रदूषण, बदलती हवा, अन्नात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक घटकांमधून अॅलर्जी होण्याचे प्रमाण वाढते असले तरीही ती कायमस्वरूपाची आहे का, याचीही चाचपणी करायला हवी. या चाचण्या करणे गैर नसले तरीही त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्हायला हव्या, असे त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. विकास पवार यांनी स्पष्ट केले आहे.