म. टा. प्रतिनिधी, मुंबई
सकाळी गारवा आणि दुपारनंतर वातावरणातील उष्मा वाढल्यामुळे मुंबईकरांच्या प्रकृतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ताप, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखीच्या त्रासाने मुंबईकर बेजार झाले असून वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना जाणवतो आहे. वातावरणातील आर्द्रता आणि उष्मा जसजसा वाढत जाईल तसा संसर्गजन्य ताप आणि त्यासह येणाऱ्या इतर लक्षणांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
अशा प्रकारच्या वातावरणामध्ये हवेतील आर्द्रता वाढते. यावर्षी ऑक्टोबर हिटची झळ मुंबईकरांना जाणवली नाही. थंडीचा जोरही वाढता होता. त्यामुळे अशा वातावरणामध्ये कोणत्याही आजार वा संसर्गाचा प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या विषाणूंचा जोर कमी असतो. मात्र उष्मा वाढल्यानंतर प्रकृतीच्या तक्रारी वाढत्या आहेत.
संसर्गजन्य तापाचे विषाणू वेगाने कार्यरत होऊन त्यांची लागण होण्याची क्षमताही वाढते. लहान मुले, गरोदर माता आणि वयोवृद्ध व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे तापाचा संसर्ग वाढतो, त्यामुळे चांगला पोषक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती सक्षम ठेवायला हवी, याकडे फिजिशिअन डॉ. सुमेध पाटील लक्ष वेधले. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विषाणू संसर्ग होऊन ताप येण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. काही दिवस औषधोपचार घेतल्यानंतर औषधे बंद केली की तापाचा जोर पुन्हा वाढतो. लहान मुलांमध्ये हातपाय दुखणे, डोळे दुखणे, घशामध्ये संसर्ग होऊन घसादुखी होणे यासारखा त्रास वाढला आहे.
ताप आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर हा संसर्ग वाढतो.
ही काळजी घ्या...
ताप आल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. बर्फ तसेच शीतपेयांचे सेवन करू नये. तळलेले पदार्थ खाऊ नये. पाणी उकळून प्यावे, उष्म्यापासून बचाव करण्यासाठी थंड पाण्याचा, पदार्थांचा सतत मारा करू नये, कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, या तापाची लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाऊन योग्य प्रकारे चाचण्या करून घ्याव्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सकाळी गारवा आणि दुपारनंतर वातावरणातील उष्मा वाढल्यामुळे मुंबईकरांच्या प्रकृतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. ताप, डोकेदुखी, सर्दी, अंगदुखीच्या त्रासाने मुंबईकर बेजार झाले असून वातावरणातील या बदलाचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना जाणवतो आहे. वातावरणातील आर्द्रता आणि उष्मा जसजसा वाढत जाईल तसा संसर्गजन्य ताप आणि त्यासह येणाऱ्या इतर लक्षणांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
अशा प्रकारच्या वातावरणामध्ये हवेतील आर्द्रता वाढते. यावर्षी ऑक्टोबर हिटची झळ मुंबईकरांना जाणवली नाही. थंडीचा जोरही वाढता होता. त्यामुळे अशा वातावरणामध्ये कोणत्याही आजार वा संसर्गाचा प्रादुर्भाव निर्माण करणाऱ्या विषाणूंचा जोर कमी असतो. मात्र उष्मा वाढल्यानंतर प्रकृतीच्या तक्रारी वाढत्या आहेत.
संसर्गजन्य तापाचे विषाणू वेगाने कार्यरत होऊन त्यांची लागण होण्याची क्षमताही वाढते. लहान मुले, गरोदर माता आणि वयोवृद्ध व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे तापाचा संसर्ग वाढतो, त्यामुळे चांगला पोषक आहार घेऊन रोगप्रतिकारशक्ती सक्षम ठेवायला हवी, याकडे फिजिशिअन डॉ. सुमेध पाटील लक्ष वेधले. गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विषाणू संसर्ग होऊन ताप येण्याचे प्रमाण वाढीस लागले होते. काही दिवस औषधोपचार घेतल्यानंतर औषधे बंद केली की तापाचा जोर पुन्हा वाढतो. लहान मुलांमध्ये हातपाय दुखणे, डोळे दुखणे, घशामध्ये संसर्ग होऊन घसादुखी होणे यासारखा त्रास वाढला आहे.
ताप आल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर हा संसर्ग वाढतो.
ही काळजी घ्या...
ताप आल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. बर्फ तसेच शीतपेयांचे सेवन करू नये. तळलेले पदार्थ खाऊ नये. पाणी उकळून प्यावे, उष्म्यापासून बचाव करण्यासाठी थंड पाण्याचा, पदार्थांचा सतत मारा करू नये, कोणत्याही प्रकारचा ताप अंगावर काढू नका, या तापाची लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाऊन योग्य प्रकारे चाचण्या करून घ्याव्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.