अ‍ॅपशहर

मुंबईची विमाने कमी वक्तशीर

एकीकडे गेल्यावर्षीच्या तुलनेत महिन्यागणिक १७ टक्क्यांनी विमानप्रवाशांची संख्या देशभरात वाढत आहे, त्याचवेळी विमानांचा वक्तशीरपणा राखण्यात अनेक आव्हाने उभी आहेत. यात मुंबईहून उडणाऱ्या विमानांचा वक्तशीरपणा दिल्ली, बेंगळुरू व हैदराबाद विमानतळांच्या तुलनेत सर्वांत कमी होता, असे ऑक्टोबर तसेच याआधीच्याही अहवालांवर नजर टाकली असता स्पष्ट होते.

Maharashtra Times 19 Nov 2017, 4:00 am
देशभरात प्रवासीसंख्येत मात्र १७ टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbais planes are not on time
मुंबईची विमाने कमी वक्तशीर


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

एकीकडे गेल्यावर्षीच्या तुलनेत महिन्यागणिक १७ टक्क्यांनी विमानप्रवाशांची संख्या देशभरात वाढत आहे, त्याचवेळी विमानांचा वक्तशीरपणा राखण्यात अनेक आव्हाने उभी आहेत. यात मुंबईहून उडणाऱ्या विमानांचा वक्तशीरपणा दिल्ली, बेंगळुरू व हैदराबाद विमानतळांच्या तुलनेत सर्वांत कमी होता, असे ऑक्टोबर तसेच याआधीच्याही अहवालांवर नजर टाकली असता स्पष्ट होते.

नागरी हवाई वाहतूक संचालनालयातर्फे (डीजीसीए) हा आहवाल जारी करण्यात आला आहे. याआधीच्या महिन्यांमध्येही मुंबईहून उडणाऱ्या विमानांचा वक्तशीरपणा इतर विमानतळांच्या तुलनेत कमी होता. देशभरात विमानांना विलंब होण्याची ६३ टक्के कारणे ही ‘रिअॅक्शनरी’ म्हणजे विविध कारणांचा परिपाक होती. तर हवाई नियंत्रण कक्षाकडून हिरवा कंदिल मिळण्याशी निगडित २१ टक्के कारणे होती.

एअर इंडिया, जेट विरोधात सर्वाधिक तक्रारी…

एअर इंडिया व त्यानंतर जेट एअरवेजबाबत प्रवाशांच्या सर्वाधिक तक्रारी आल्या. ऑक्टोबरमध्ये एकूण ६५६ तक्रारी प्रवाशांकडून आल्या. एकूण तक्रारींपैकी २२ टक्के तक्रारी बॅगेजसंदर्भात होत्या. आठ टक्के तक्रारी परताव्याच्या रकमेसंदर्भात होत्या.

प्रवासीसंख्या वाढली

देशभरात विमान प्रवाशांची संख्या सतत वाढते आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या काळात गेल्यावर्षीच्या तुलनेत याच काळातील प्रवासीसंख्या ८१ कोटी ३७ लाख प्रवाशांवरून ९५ कोटी ४४ लाख ५० हजार प्रवासी म्हणजे १७.३० टक्क्यांनी वाढली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज