अ‍ॅपशहर

...तर मुसलमान शस्त्र उचलू शकतात!: आझमी

गोरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचा निषेध करताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काहीसं आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. 'गोरक्षणाच्या नावाखाली होणारे हल्ले न थांबल्यास मुसलमानही शस्त्र उचलू शकतात. तसं झालं तर देश सांभाळणं कठीण होऊन जाईल,' असं आझमी यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Times 17 Jul 2017, 3:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslims may react if centre does not stop gau rakshaks say abu azmi
...तर मुसलमान शस्त्र उचलू शकतात!: आझमी


गोरक्षणाच्या मुद्द्यावरून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांचा निषेध करताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. 'गोरक्षणाच्या नावाखाली होणारे हल्ले न थांबल्यास मुसलमानही शस्त्र उचलू शकतात. तसं झालं तर देश सांभाळणं कठीण होऊन जाईल,' असं आझमी यांनी म्हटलं आहे.

'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 'ज्या-ज्या राज्यांत भाजपचं सरकार आहे, तिथं मुस्लिमांवर हल्ल्याच्या घटना होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केवळ या घटनांचा निषेध केला आहे. मात्र, प्रत्यक्षात सरकारकडून काही कृती होताना दिसत नाही. त्यामुळं गोरक्षकांचं बळ वाढलं आहे. हे सगळं थांबायला हवं. गोरक्षणाच्या नावाखाली एकट्या-दुकट्या माणसाला गाठून मारणं हे दहशतवादी कृत्य ठरवलं गेलं पाहिजे,' अशी मागणी आझमी यांनी केली.

'सततच्या हल्ल्याच्या घटनांमुळं देशातील वातावरण खराब झालं आहे. विशिष्ट प्रकारचा वेष घालून प्रवास करायलाही लोक घाबरत आहेत. हे सगळं चिंताजनक आहे. अशा स्थितीत अॅक्शनला रिअॅक्शन येऊ शकते. एका मर्यादेपर्यंत माणूस हे सहन करेल. पण नंतर तो शस्त्र घेऊन सूड उगवणारच,' असं आझमी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज