नायर रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेने मारू कुटुंबीयांना धक्का
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
नायर रुग्णालयाच्या असंवेदनशील वृत्तीचा प्रत्यत गुरुवारी पुन्हा एकदा आला. या रुग्णालयाच्या एमआरआय मशिनमध्ये अडकून मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू यांची हाताची बोट घेऊन जाण्यासाठी रुग्णालयातून मारू कुटुंबियांना फोन आल्यामुळे, आधीच या दुखा:तून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जबरदस्त मानसिक आघात झाला आहे.
सुमारे अठरा दिवसांपूवी नायर रुग्णालयाच्या एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारू या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एमआरआय मशिनमध्ये राजेश मारू खेचले गेले, तेव्हा त्यांच्या हाताची बोटेही तुटली होती. अंत्यसंस्काराच्या वेळेस मारू कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत रुग्णालयाकडे विचारणा केली. पण त्यावेळी रुग्णालयाने बोटे दिली नाहीत. राजेश याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरुण मुलगा अचानक गमावल्याच्या दुखा:तून सावरण्याचा प्रयत्न मारू कुटुंबीय करीत होते.
पण त्यातच गुरुवारी नायर रुग्णालयातून मारू कुटुंबीयांच्या घरी फोन करण्यात आला. राजेश मारू यांच्या हाताची बोटे घेऊन जाण्यास रुग्णालयातून सांगण्यात आले. मारू कुटुंबीयांसाठी हा प्रकार अतिशय धक्कादायक होता. मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या वेळेस आम्ही रुग्णालयाकडे बोटांची वारंवार मागणी केली. पण रुग्णालयाने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. आता रुग्णालयातून अचानक फोन आला आणि हाताची बोटे घेऊन जाण्यास सांगितले, हा प्रकार अतिशय चीड आणणारा असल्याचे मारू कुटुंबीयांनी सांगितले. रुग्णालयातून फोन आल्यावर पुन्हा मनाला अतिशय वेदना झाल्या, असे कुटुंबातील सदस्य डोळ्यात पाणी आणून सांगत होते.
रुग्णालयातील या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पूर्वीच देण्यात आले आहे. निष्काळजीपणा दाखवण्याच्या व राजेश मारू यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवता आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. सौरव लांजेकर, डॉ. सिद्धांत शहा, वॉडबॉय विठ्ठल चव्हाण व महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वे यांना अटक करण्यात आली होती.
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
नायर रुग्णालयाच्या असंवेदनशील वृत्तीचा प्रत्यत गुरुवारी पुन्हा एकदा आला. या रुग्णालयाच्या एमआरआय मशिनमध्ये अडकून मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू यांची हाताची बोट घेऊन जाण्यासाठी रुग्णालयातून मारू कुटुंबियांना फोन आल्यामुळे, आधीच या दुखा:तून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जबरदस्त मानसिक आघात झाला आहे.
सुमारे अठरा दिवसांपूवी नायर रुग्णालयाच्या एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारू या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एमआरआय मशिनमध्ये राजेश मारू खेचले गेले, तेव्हा त्यांच्या हाताची बोटेही तुटली होती. अंत्यसंस्काराच्या वेळेस मारू कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत रुग्णालयाकडे विचारणा केली. पण त्यावेळी रुग्णालयाने बोटे दिली नाहीत. राजेश याच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरुण मुलगा अचानक गमावल्याच्या दुखा:तून सावरण्याचा प्रयत्न मारू कुटुंबीय करीत होते.
पण त्यातच गुरुवारी नायर रुग्णालयातून मारू कुटुंबीयांच्या घरी फोन करण्यात आला. राजेश मारू यांच्या हाताची बोटे घेऊन जाण्यास रुग्णालयातून सांगण्यात आले. मारू कुटुंबीयांसाठी हा प्रकार अतिशय धक्कादायक होता. मृतदेहावर अंत्यसंस्काराच्या वेळेस आम्ही रुग्णालयाकडे बोटांची वारंवार मागणी केली. पण रुग्णालयाने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. आता रुग्णालयातून अचानक फोन आला आणि हाताची बोटे घेऊन जाण्यास सांगितले, हा प्रकार अतिशय चीड आणणारा असल्याचे मारू कुटुंबीयांनी सांगितले. रुग्णालयातून फोन आल्यावर पुन्हा मनाला अतिशय वेदना झाल्या, असे कुटुंबातील सदस्य डोळ्यात पाणी आणून सांगत होते.
रुग्णालयातील या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पूर्वीच देण्यात आले आहे. निष्काळजीपणा दाखवण्याच्या व राजेश मारू यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवता आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. सौरव लांजेकर, डॉ. सिद्धांत शहा, वॉडबॉय विठ्ठल चव्हाण व महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वे यांना अटक करण्यात आली होती.