अ‍ॅपशहर

नाणार तिढा कायम

वादग्रस्त नाणार रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध करण्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद पडले. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी सदस्य नाईलाजास्तव एकत्र आले; मात्र, त्यातही शिवसेनेचे नाणारचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप काँग्रेसने केला, तर 'आमच्यामुळेच हा प्रकल्प रद्द होणार', असा दावा शिवसेनेने केला.

Sanjay Vhanmane | Maharashtra Times 13 Jul 2018, 4:00 am
नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur-vidhan-bhavan


वादग्रस्त नाणार रिफायनरीच्या प्रकल्पाला विरोध करण्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही बंद पडले. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानसभेत सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी सदस्य नाईलाजास्तव एकत्र आले; मात्र, त्यातही शिवसेनेचे नाणारचे प्रेम बेगडी असल्याचा आरोप काँग्रेसने केला, तर 'आमच्यामुळेच हा प्रकल्प रद्द होणार', असा दावा शिवसेनेने केला.

कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाणार प्रकल्पावर चर्चेची मागणी करीत स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना केली. त्यासाठी शिवसेनेनेही आग्रही भूमिका घेतली. मात्र, अध्यक्षांनी प्रस्ताव नाकारला. तरीही विखे-पाटील यांनी नाणारवर बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. 'प्रकल्पाबाबत दुटप्पी राजकारण करणारे या सभागृहात बसले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना खासदारही आत एक आणि बाहेर एक अशी भूमिका घेत आहेत' असे म्हणत, नाणार येथे बोगस कागदपत्रांच्या आधारे भुसंपदानाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज