मुंबई: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आरोपांची राळ उडवून दिल्यामुळे अडचणीत सापडलेल्या राणे पितापुत्रांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणे यांना १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधाने केल्याबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश (Nitesh Rane) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या दोघांना जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्सही बजावण्यात आले होते. मात्र, नारायण राणे यांनी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यांनी पोलिसांना पत्र पाठवून तशी विनंतीही केली होती. यानंतर राणे पितापुत्रांनी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. (Narayan Rane and son Nitesh Rane get interim protection from arrest in Disha Salian case)
या अर्जावर शुक्रवारी दिंडोशी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली. दरम्यान आता नितेश राणे शनिवारी दुपारी एक वाजता मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत. मात्र, १० तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण असल्याने ते काहीसे निश्चिंत असतील.
मुंबई पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, तुर्तास राणे पितापुत्रांना अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
या अर्जावर शुक्रवारी दिंडोशी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना लेखी उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्चला होणार आहे. तोपर्यंत नारायण राणे आणि नितेश राणे यांना अटक होणार नसल्याची हमी विशेष सरकारी वकिलांनी दिली. दरम्यान आता नितेश राणे शनिवारी दुपारी एक वाजता मालवणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी जाणार आहेत. मात्र, १० तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण असल्याने ते काहीसे निश्चिंत असतील.
मुंबई पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले होते. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवर कारवाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारनेही भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राणे पिता-पुत्र ठाकरे सरकारचं पहिलं टार्गेट ठरणार का, अशी चर्चा सुरु होती. मात्र, तुर्तास राणे पितापुत्रांना अटकेच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.