म. टा. प्रतिनिधी, मुंबई
देशभरातील आयआयटी आणि तत्सम इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकची वृंदा राठी ३२१ गुण मिळवित देशभरातील मुलींमध्ये सर्वप्रथम आली असून, उदयपूर येथील कल्पित वीरवाल याने ३६० पैकी ३६० गुण मिळवित देशात सर्वप्रथम येण्याचा बहुमान आपल्या नावे केला आहे. या परीक्षेत एकूण २ लाख २१ हजार ४२७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.
२ ते ९ एप्रिल या काळात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने देशभरातील ११३ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा परीक्षेसाठी ११ लाख २२ हजार ३५१ विद्यार्थी बसले होते. यातील एकूण २ लाख २१ हजार ४२७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. ऑफलाइन परीक्षा एकूण १ लाख ६५ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी तर ऑनलाइन परीक्षा ९ लाख ५६ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी दिली.
वृंदा राठीनंतर पूर्वा गर्ग हिने ३१९ गुणासह दुसऱ्या, तर नारायणा रेड्डी हिने ३१८ गुण नोंदवित तिसऱ्या स्थानावर नाव कोरले आहे. यंदाच्या निकालात पहिल्या हजार विद्यार्थ्यांमध्ये ९३२ मुलांचा तर ६८ मुलींचा समावेश आहे. पहिल्या पाच हजार विद्यार्थ्यांमध्येही मुलांचा दबदबा कायम राहिला असून, त्यात ४५३४ मुले आणि फक्त ४६६ मुलींचा समावेश असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे.
यंदाही कट ऑफ घसरला
गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही या परीक्षेचा कट ऑफ घसरला असून यंदा खुल्या वर्गाचा कट ऑफ ८१ गुणांचा नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी खुल्या गटासाठीचा कट ऑफ १०० गुण इतका होता. खुल्या वर्गाप्रमाणे इतर गटांचे कट ऑफही घसरल्याचे दिसून आले असून ओबीसीसाठी ४९, एससीसाठी ३२, एसटीसाठी २७ आणि पीडब्ल्यूडीसाठी १ असे गुण नोंदविण्यात आल्याची माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली.
संशोधन क्षेत्रात करिअर करायचेय
नाशिकः वृंदा राठी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आयआयएस) पुढील शिक्षण घेणार आहे. संशोधन क्षेत्रात करिअर करायची तिला इच्छा असून, शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न असल्याचे ती म्हणाली. वृंदा हिने नाशिकमधील लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले असून, ती आयआयटी पेसची विद्यार्थिनी आहे. वृंदा परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने सामोरी गेल्याचे तिची आई कृष्णा राठी यांनी सांगितले. सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवर वृंदा मुलींमध्ये प्रथम आल्याचे सांगताच अत्यानंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
छंदालाही प्राधान्य
जेईईमध्ये देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही अतिशय मोठी बाब आहे. त्यासाठी योग्य मेहनत घेतल्याचे मत व्यक्त करतानाच छंदांनाही प्राधान्य दिल्याचे वृंदा हिने सांगितले. बासरीवादनाची तिला आवड असून अभ्यासातून रिलॅक्स होण्यासाठी या छंदाचा आधार ती घेते. याशिवाय तिला वाचनाचीही तिला आवड आहे.
जेईई क्रॅक करायचा निर्धार केला आणि दोन वर्षे या अभ्यासासाठी स्वतःला समर्पित केलं. त्यामुळे ही परीक्षा पास होणे सोपे गेले. अभ्यासातून जरा निवांत वाटावे यासाठी मी बासरीवादन करायचे. त्याचाही मला या यशात खूप लाभ झाला.
- वृंदा राठी
देशभरातील आयआयटी आणि तत्सम इंजिनीअरिंग संस्थांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मेन परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकची वृंदा राठी ३२१ गुण मिळवित देशभरातील मुलींमध्ये सर्वप्रथम आली असून, उदयपूर येथील कल्पित वीरवाल याने ३६० पैकी ३६० गुण मिळवित देशात सर्वप्रथम येण्याचा बहुमान आपल्या नावे केला आहे. या परीक्षेत एकूण २ लाख २१ हजार ४२७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत.
२ ते ९ एप्रिल या काळात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने देशभरातील ११३ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसईने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा परीक्षेसाठी ११ लाख २२ हजार ३५१ विद्यार्थी बसले होते. यातील एकूण २ लाख २१ हजार ४२७ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. ऑफलाइन परीक्षा एकूण १ लाख ६५ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी तर ऑनलाइन परीक्षा ९ लाख ५६ हजार ७१६ विद्यार्थ्यांनी दिली.
वृंदा राठीनंतर पूर्वा गर्ग हिने ३१९ गुणासह दुसऱ्या, तर नारायणा रेड्डी हिने ३१८ गुण नोंदवित तिसऱ्या स्थानावर नाव कोरले आहे. यंदाच्या निकालात पहिल्या हजार विद्यार्थ्यांमध्ये ९३२ मुलांचा तर ६८ मुलींचा समावेश आहे. पहिल्या पाच हजार विद्यार्थ्यांमध्येही मुलांचा दबदबा कायम राहिला असून, त्यात ४५३४ मुले आणि फक्त ४६६ मुलींचा समावेश असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे.
यंदाही कट ऑफ घसरला
गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही या परीक्षेचा कट ऑफ घसरला असून यंदा खुल्या वर्गाचा कट ऑफ ८१ गुणांचा नोंदविण्यात आला आहे. गेल्यावर्षी खुल्या गटासाठीचा कट ऑफ १०० गुण इतका होता. खुल्या वर्गाप्रमाणे इतर गटांचे कट ऑफही घसरल्याचे दिसून आले असून ओबीसीसाठी ४९, एससीसाठी ३२, एसटीसाठी २७ आणि पीडब्ल्यूडीसाठी १ असे गुण नोंदविण्यात आल्याची माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली.
संशोधन क्षेत्रात करिअर करायचेय
नाशिकः वृंदा राठी बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आयआयएस) पुढील शिक्षण घेणार आहे. संशोधन क्षेत्रात करिअर करायची तिला इच्छा असून, शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न असल्याचे ती म्हणाली. वृंदा हिने नाशिकमधील लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले असून, ती आयआयटी पेसची विद्यार्थिनी आहे. वृंदा परीक्षेला अतिशय आत्मविश्वासाने सामोरी गेल्याचे तिची आई कृष्णा राठी यांनी सांगितले. सीबीएसईचे चेअरमन आर. के. चतुर्वेदी यांनी फोनवर वृंदा मुलींमध्ये प्रथम आल्याचे सांगताच अत्यानंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
छंदालाही प्राधान्य
जेईईमध्ये देशभरातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणे ही अतिशय मोठी बाब आहे. त्यासाठी योग्य मेहनत घेतल्याचे मत व्यक्त करतानाच छंदांनाही प्राधान्य दिल्याचे वृंदा हिने सांगितले. बासरीवादनाची तिला आवड असून अभ्यासातून रिलॅक्स होण्यासाठी या छंदाचा आधार ती घेते. याशिवाय तिला वाचनाचीही तिला आवड आहे.
जेईई क्रॅक करायचा निर्धार केला आणि दोन वर्षे या अभ्यासासाठी स्वतःला समर्पित केलं. त्यामुळे ही परीक्षा पास होणे सोपे गेले. अभ्यासातून जरा निवांत वाटावे यासाठी मी बासरीवादन करायचे. त्याचाही मला या यशात खूप लाभ झाला.
- वृंदा राठी