म. टा. प्रतिनिधी, मुंबई
नवरात्रीवर यंदा पावसाचे सावट असले तरी सणांच्या रंगांपासून मुंबईकर स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण असल्याने त्यासाठी मुंबईने जय्यत तयारी केली आहे. आज, रविवारपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील.
यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. आता पुढील नऊ रात्री अनेक मुंबईकर चनिया, घागरा, कुर्ते, इंडो-वेस्टर्न कपडे घालून मुंबईला आपल्या अनोख्या रंगांमध्ये रंगवणार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. घागरा, रंगीत जॅकेट, चमकदार ब्लाऊज, कुर्ते यांच्या स्टॉलला गराडा होता. पावसाचा फटका फुलबाजाराला बसला असला तरी घरी घट बसवणाऱ्यांची फुलबाजारात गर्दी होतीच. शनिवारी अनेक मंडळांच्या देवीच्या मूर्ती मंडपांमध्ये स्थानापन्न झाल्या.
मंदीचा सामना करत उत्सवाच्या उत्साहाला ओहोटी लागू न देता देवीसाठीही भव्य सजावट करण्यात आली आहे. शीव येथील मुंबईची माऊली, भायखळ्याच्या दगडी चाळीची आई, उमरखाडीची आई देवी, लालबाग-परळमधील संतोषी माता मित्र मंडळ, चारकोपची आई, भांडुपची उत्साहीची आई, गडेकर नवरात्रोत्सव अशा अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे भव्यतेची परंपरा कायम राखली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीच्या स्पर्धांचेही आयोजन केले आहे. सणांची परंपरा जपण्यासोबत या मंडळांनी सामाजिक भानही जपले आहे. अनेक मंडळांनी पश्चिम महारष्ट्रातील पूरग्रस्त भागात जाऊन आर्थिक, जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वतः सुपूर्द केली आहे.
देवीसाठी खास गाणी...
दरवर्षीप्रमाणेच यंदाही नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली आहे. अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीची स्वतंत्र गाणी तयार करण्यात आली आहेत.
जोगेश्वरीमधील अभिनव मंडळाने आपल्या 'अभिनवची कुलस्वामिनी' हे गाणे तयार केले. येथील स्थानिक तरुणांनी दोन वर्षांपूर्वी 'कुलस्वामिनी बीट्स' हा स्वतःचा बँड तयार केला होता. त्यांनीच हे नवे गाणे देवीला समर्पित केले आहे. तर येथीलच बालगणेश मंडळानेही आपल्या आई देवीसाठी या गाण्याची निर्मिती केली आहे. मुंबईतील साधारण २० टक्के मंडळांनी आपल्या देवीसाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने नव्या गाण्यांची निर्मिती केल्याचे कळते आहे. यामुळे देवीची सेवा आणि स्थानिक कलाकारांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न साधल्याचे अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नवरात्रीवर यंदा पावसाचे सावट असले तरी सणांच्या रंगांपासून मुंबईकर स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण असल्याने त्यासाठी मुंबईने जय्यत तयारी केली आहे. आज, रविवारपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील.
यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. आता पुढील नऊ रात्री अनेक मुंबईकर चनिया, घागरा, कुर्ते, इंडो-वेस्टर्न कपडे घालून मुंबईला आपल्या अनोख्या रंगांमध्ये रंगवणार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. घागरा, रंगीत जॅकेट, चमकदार ब्लाऊज, कुर्ते यांच्या स्टॉलला गराडा होता. पावसाचा फटका फुलबाजाराला बसला असला तरी घरी घट बसवणाऱ्यांची फुलबाजारात गर्दी होतीच. शनिवारी अनेक मंडळांच्या देवीच्या मूर्ती मंडपांमध्ये स्थानापन्न झाल्या.
मंदीचा सामना करत उत्सवाच्या उत्साहाला ओहोटी लागू न देता देवीसाठीही भव्य सजावट करण्यात आली आहे. शीव येथील मुंबईची माऊली, भायखळ्याच्या दगडी चाळीची आई, उमरखाडीची आई देवी, लालबाग-परळमधील संतोषी माता मित्र मंडळ, चारकोपची आई, भांडुपची उत्साहीची आई, गडेकर नवरात्रोत्सव अशा अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे भव्यतेची परंपरा कायम राखली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीच्या स्पर्धांचेही आयोजन केले आहे. सणांची परंपरा जपण्यासोबत या मंडळांनी सामाजिक भानही जपले आहे. अनेक मंडळांनी पश्चिम महारष्ट्रातील पूरग्रस्त भागात जाऊन आर्थिक, जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वतः सुपूर्द केली आहे.
देवीसाठी खास गाणी...
दरवर्षीप्रमाणेच यंदाही नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली आहे. अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीची स्वतंत्र गाणी तयार करण्यात आली आहेत.
जोगेश्वरीमधील अभिनव मंडळाने आपल्या 'अभिनवची कुलस्वामिनी' हे गाणे तयार केले. येथील स्थानिक तरुणांनी दोन वर्षांपूर्वी 'कुलस्वामिनी बीट्स' हा स्वतःचा बँड तयार केला होता. त्यांनीच हे नवे गाणे देवीला समर्पित केले आहे. तर येथीलच बालगणेश मंडळानेही आपल्या आई देवीसाठी या गाण्याची निर्मिती केली आहे. मुंबईतील साधारण २० टक्के मंडळांनी आपल्या देवीसाठी स्थानिक कलाकारांच्या मदतीने नव्या गाण्यांची निर्मिती केल्याचे कळते आहे. यामुळे देवीची सेवा आणि स्थानिक कलाकारांच्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न साधल्याचे अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.