मुंबई: नया है वह, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. तसेच पार्थ यांच्यावरील टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पार्थ पवार यांच्याबद्दल बोलले. शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलंच आहे. त्यावर मी अधिक बोलण्याची गरज नाही. पार्थ यांना त्यांनी सल्ला दिला. पार्थ राजकारणात नवीन आहेत. हिंदीतच सांगायचे म्हणजे नया है वह, असं भुजबळ म्हणाले.
पार्थ यांच्याबद्दल पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून पवार कुटुंबात कलह असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पार्थ यांच्यावरील टीकेवरून अजित पवार दुखावलेले नाहीत. कुणीही दुखावलेलं नाही, नाराज नाही. पवार कुटुंब एकत्र आहे. आम्हीही सर्वजण त्या कुटुंबाचेच सदस्य आहोत, असं सांगतानाच कुटुंबात लहानांना समजावण्याचं काम वरिष्ठ मंडळी करतच असतात. त्यात नवीन काही नाही, असं सांगत भुजबळ यांनी या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले. मात्र, ते मीडियाला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे अजितदादा नाराज असलेल्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.
nilesh rane : आजोबांनी नातवाची लायकी काढली हे पहिल्यांदाच पाहिलं: निलेश राणे
काय म्हणाले होते पवार
पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
नाही म्हणत म्हणत देवेंद्र फडणवीस पवार कुटुंबातील वादावर बोललेच!
काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.
निशाणा नेमका कुणावर?
छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार प्रकरणावर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पार्थ पवार यांच्याबद्दल बोलले. शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलंच आहे. त्यावर मी अधिक बोलण्याची गरज नाही. पार्थ यांना त्यांनी सल्ला दिला. पार्थ राजकारणात नवीन आहेत. हिंदीतच सांगायचे म्हणजे नया है वह, असं भुजबळ म्हणाले.
पार्थ यांच्याबद्दल पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून पवार कुटुंबात कलह असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पार्थ यांच्यावरील टीकेवरून अजित पवार दुखावलेले नाहीत. कुणीही दुखावलेलं नाही, नाराज नाही. पवार कुटुंब एकत्र आहे. आम्हीही सर्वजण त्या कुटुंबाचेच सदस्य आहोत, असं सांगतानाच कुटुंबात लहानांना समजावण्याचं काम वरिष्ठ मंडळी करतच असतात. त्यात नवीन काही नाही, असं सांगत भुजबळ यांनी या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार आज नेहमीप्रमाणे मंत्रालयात आले. मात्र, ते मीडियाला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे अजितदादा नाराज असलेल्या चर्चांना अधिकच बळ मिळत आहे.
nilesh rane : आजोबांनी नातवाची लायकी काढली हे पहिल्यांदाच पाहिलं: निलेश राणे
काय म्हणाले होते पवार
पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
नाही म्हणत म्हणत देवेंद्र फडणवीस पवार कुटुंबातील वादावर बोललेच!
काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.
निशाणा नेमका कुणावर?