मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आगामी मुलाखत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 'मी स्वत: तेव्हा संसदेतील नरेंद्र मोदी यांच्या चेम्बरमध्ये गेलो होतो, असं पवारांनी या मुलाखतीत म्हटलंय. 'मोदींच्या चेम्बरमध्ये जाऊन पवार त्यांच्याशी नेमकं काय बोलले होते,' याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. (NCP Chief Sharad Pawar's interview to shiv sena mouthpiece Saamana)
वाचा: पोलिसांची गाडी उलटली आणि विकास दुबेचा कारभार आटोपला!
येत्या ११ जुलैपासून, म्हणजेच उद्यापासून शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊनपासून ते राम मंदिर आंदोलनाच्या विषयावरही पवारांनी मतं मांडली आहेत. देशाच्या राजकारणातील किस्से आणि अनुभव सांगितले आहेत. बाळासाहेब ठाकरे, भाजप व महाविकास आघाडी यांच्या बाबतीत पवार यांनी व्यक्त केलेली मतं हा यातील सर्वाधिक उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहे.
वाचा: 'सारथी'चं सूत्रे अजित पवारांनी स्वत:कडे का घेतली?
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुलाखतीचा तिसरा प्रोमो ट्विट केला आहे. त्यात शरद पवार हे मोदी-शहा जोडगोळी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर तोफ डागताना दिसतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अलीकडंच केंद्र सरकारनं दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस दिली होती. त्याबद्दल बोलताना हे क्षुद्रपणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ता ही विनयानं वापरायची असते. सत्तेचा दर्प डोक्यात गेला ती डोक्यात गेली की अशा गोष्टी होतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
'उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेची पद्धत आहे. भाजपच्या हातात सरकार जाऊ देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही,' असंही पवार या मुलाखतीत म्हणालेत. राज्यात सेन्सॉर ऑफ पावर एकच असली पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील आजच्या विरोधी पक्षाला तुम्ही काय सल्ला द्याल? ठाकरे सरकारचं भविष्य काय? या प्रश्नांची उत्तरही पवारांनी दिली आहेत.
वाचा: बाळासाहेब आणि भाजपचे विचार कधीच सुसंगत नव्हते-शरद पवार
वाचा: पोलिसांची गाडी उलटली आणि विकास दुबेचा कारभार आटोपला!
येत्या ११ जुलैपासून, म्हणजेच उद्यापासून शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊनपासून ते राम मंदिर आंदोलनाच्या विषयावरही पवारांनी मतं मांडली आहेत. देशाच्या राजकारणातील किस्से आणि अनुभव सांगितले आहेत. बाळासाहेब ठाकरे, भाजप व महाविकास आघाडी यांच्या बाबतीत पवार यांनी व्यक्त केलेली मतं हा यातील सर्वाधिक उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहे.
वाचा: 'सारथी'चं सूत्रे अजित पवारांनी स्वत:कडे का घेतली?
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुलाखतीचा तिसरा प्रोमो ट्विट केला आहे. त्यात शरद पवार हे मोदी-शहा जोडगोळी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर तोफ डागताना दिसतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अलीकडंच केंद्र सरकारनं दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस दिली होती. त्याबद्दल बोलताना हे क्षुद्रपणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ता ही विनयानं वापरायची असते. सत्तेचा दर्प डोक्यात गेला ती डोक्यात गेली की अशा गोष्टी होतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
'उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेची पद्धत आहे. भाजपच्या हातात सरकार जाऊ देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही,' असंही पवार या मुलाखतीत म्हणालेत. राज्यात सेन्सॉर ऑफ पावर एकच असली पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील आजच्या विरोधी पक्षाला तुम्ही काय सल्ला द्याल? ठाकरे सरकारचं भविष्य काय? या प्रश्नांची उत्तरही पवारांनी दिली आहेत.
वाचा: बाळासाहेब आणि भाजपचे विचार कधीच सुसंगत नव्हते-शरद पवार