अ‍ॅपशहर

मुंबईत जाऊन फिरू नका, ग्रंथालयात जा; तरुण आमदारांना पवारांचा सल्ला

'प्रथमच आमदार झालेल्या तरुणांनी मुंबईत जाऊन फिरत बसू नये. त्याऐवजी ग्रंथालयात जावं. सीनियर लोकांची भाषणं वाचावी. प्रभावी संसदपटू कसं होता येईल हे पाहावं,' असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या आमदारांना दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2019, 1:40 pm
मुंबई: 'प्रथमच आमदार झालेल्या तरुणांनी मुंबईत जाऊन फिरत बसू नये. त्याऐवजी ग्रंथालयात जावं. सीनियर नेत्यांची भाषणं वाचावीत. प्रभावी संसदपटू कसं होता येईल हे पाहावं,' असा मोलाचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्या आमदारांना दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ncp chief sharad pawars valuable advice to young mlas
मुंबईत जाऊन फिरू नका, ग्रंथालयात जा; तरुण आमदारांना पवारांचा सल्ला


निवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच ट्विटवर

विधानसभा निवडणूक निकालानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पवार कुटुंबातील रोहित यांच्यासह राज्यातील अनेक तरुण विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. या तरुणांना पवारांनी यावेळी काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. 'ज्यांनी संधी दिली, त्यांच्याशी प्रामाणिक राहा. अधिवेशनानिमित्तानं मुंबईत गेल्यावर तिथं फिरू नका. त्याऐवजी ग्रंथालयात जा. तिथं जुन्या-जाणत्या मंडळींची भाषणं वाचा. प्रभावी संसदपटू कसं होता येईल हे पाहा. राज्यातील प्रश्नांसंबंधी माहिती घेत जा. अभ्यास करत राहा', असा सल्ला त्यांनी नव्या आमदारांना दिला आहे.

वाचा: हरलोय पण संपलो नाही; उदयनराजेंचं ट्विट

सातारा, परळीचा निकाल माहीत होता!

सातारा व परळीच्या निकालावरही पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. 'सातारा आणि परळीच्या निकालाचा अनेकांना धक्का बसल्याची चर्चा मीडियात मला ऐकायला मिळते आहे. मात्र, माझ्या मनात या निकालाविषयी शंका नव्हती. हा निकाल वेगळा लागेल हे शंभर टक्के माहीत होतं. संबंधित व्यक्तीची मतदारसंघातील लोकांशी वागण्याची जी तऱ्हा आहे, ती लोक मान्य करणार नाहीत हे मला माहीत होतं,' असं पवार म्हणाले.

सत्ताधाऱ्यांच्या आचरणात फरक पडणार नाही!

विधानसभेच्या या निकालामुळं सत्ताधाऱ्यांच्या वर्तनात काही फरक पडेल असं आपल्याला अजिबात वाटत नाही, असं पवार म्हणाले. पवारांनी फार आनंदी होण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस काल म्हणाले होते. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणतात तितका काही मला आनंद झालेला नाही. पण आम्ही दु:खीही नाही. निवडणुकीच्या आधी ज्या वल्गना केल्या गेल्या, त्या खऱ्या ठरल्या नाहीत. त्यामुळं आनंदी नसलो तरी आम्ही दु:खीही नाही.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज