मुंबई : संभाव्य महाशिवआघाडीच्या नेत्यांनी आजची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट तुर्तास पुढे ढकलली आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार होते. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अभूतपूर्व असे संकट कोसळले असून या स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी ठोस पावले उचलावीत, अशी विनंती या भेटीत करण्यात येणार होती.
तिन्ही पक्षांनी निश्चित केलेली आजची राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनही या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानीचे पंचनामे वेगाने व्हावेत यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. त्याचवेळी निवडणूक खर्चाचा तपशील आणि अन्य बाबींची पूर्तता करायची असल्याने मतदारसंघात थांबावे लागले आहे. त्यामुळेच आजची राज्यपालांची नियोजित भेट तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यपालांची नव्याने वेळ घेऊन भेट घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
उद्धवच व्हावेत CM; काँग्रेस-राष्ट्रवादी आग्रही
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे राज्यातील प्रमुख नेते राज्यपालांची राजभवनात भेट घेणार, अशी माहिती शुक्रवारी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली होती. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून कसलीच मदत मिळाली नाही. यापूर्वीच्या मावळत्या सरकारने सुमारे १० हजार कोटींची मदत देण्याचे जाहीर केले असले तरी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अर्धवट आहे. शेतीतील उभ्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जगण्याचा खर्च चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना तातडीने रोख मदत ताबडतोब द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबरोबरच पीकविम्याची भरपाई मिळावी. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी नवीन कर्ज, बी-बियाणांचा आणि खतांचा पुरवठा करण्यात यावा, असेही राज्यपालांच्या कानावर घातले जाईल, असेही ते म्हणाले होते. मलिक यांच्या राज्यपाल भेटीच्या माहितीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला होता.
इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा टोला
तिन्ही पक्षांनी निश्चित केलेली आजची राज्यपालांची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडूनही या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि आमदार सध्या ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. नुकसानीचे पंचनामे वेगाने व्हावेत यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत. त्याचवेळी निवडणूक खर्चाचा तपशील आणि अन्य बाबींची पूर्तता करायची असल्याने मतदारसंघात थांबावे लागले आहे. त्यामुळेच आजची राज्यपालांची नियोजित भेट तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यपालांची नव्याने वेळ घेऊन भेट घेण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले.
उद्धवच व्हावेत CM; काँग्रेस-राष्ट्रवादी आग्रही
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांचे राज्यातील प्रमुख नेते राज्यपालांची राजभवनात भेट घेणार, अशी माहिती शुक्रवारी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिली होती. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्याच्या सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना सरकारकडून कसलीच मदत मिळाली नाही. यापूर्वीच्या मावळत्या सरकारने सुमारे १० हजार कोटींची मदत देण्याचे जाहीर केले असले तरी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अर्धवट आहे. शेतीतील उभ्या पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन जगण्याचा खर्च चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना तातडीने रोख मदत ताबडतोब द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याबरोबरच पीकविम्याची भरपाई मिळावी. रब्बी हंगामाच्या पिकांसाठी नवीन कर्ज, बी-बियाणांचा आणि खतांचा पुरवठा करण्यात यावा, असेही राज्यपालांच्या कानावर घातले जाईल, असेही ते म्हणाले होते. मलिक यांच्या राज्यपाल भेटीच्या माहितीला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुजोरा दिला होता.
इतकं मनाला लावून घेऊ नका; उद्धव यांचा टोला