मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक गट फोडून भाजपमध्ये यावे, अशी ऑफर देण्यात आली होती. मात्र, ही ऑफर नाकारल्यामुळेच जयंत पाटील यांची ईडी चौकशी लागली, असा खळबळजनक आरोप दैनिक 'सामना'तून करण्यात आला होता. या सनसनाटी दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे. भाकरी एकाची चाकरी दुसऱ्याची, हा संजय राऊतांचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे कधीकाळी ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या दैनिक 'सामना'ची अवस्था संजय राऊत यांच्या रोजच्या बडबडीप्रमाणे फेकन्यूज फॅक्टरीसारखी झाली आहे. आज सामनात जयंत पाटील यांच्याबद्दल लिखाणा करण्यात आले. जयंत पाटील यांना भाजपने प्रस्ताव देण्याचा प्रश्नच येत नाही. पण ईडीकडून सुरु असलेल्या त्यांच्या चौकशीवरील लक्ष विचलीत करण्यासाठी अशाप्रकारचे बेछूट आणि बेताल लिखाण करण्यात येत असल्याचे सांगत केशव उपाध्ये यांनी 'सामना'तील सर्व दावे फेटाळून लावले.
जयंत पाटील यांच्याविषयी सामनातून नक्की काय दावा करण्यात आला?
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र, चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत, अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती.
तसेच अनिल देशमुख यांना अडकवण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर करण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे, मनसुख हिरेनची हत्या करणे अशा कटांमध्ये ज्यांचा सहभाग होता त्या परमबीर सिंग यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगात पाठवल्याची बक्षीसच परमबीर सिंह यांना देण्यात आले आहे. उद्या सचिन वाझे, प्रदीप शर्मा या सगळ्यांनाही क्लीन चिट देण्यात येईल. या सरकारचा काही भरवसा नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.
जयंत पाटील यांच्याविषयी सामनातून नक्की काय दावा करण्यात आला?
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या घरगडय़ांसारख्या वागत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी होते, पण भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांना मोकळे रान मिळते. मात्र, चौकश्यांचा कितीही फेरा मागे लावलात तरी स्वाभिमानींना शांत झोप लागते हे जयंत पाटील यांनी दाखवून दिले. पाटला-पाटलांत फरक असतो! काही पाटलांचे पाणीच वेगळे असते. जयंतराव त्यापैकीच आहेत, अशी टिप्पणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती.
तसेच अनिल देशमुख यांना अडकवण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर करण्यात आला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे, मनसुख हिरेनची हत्या करणे अशा कटांमध्ये ज्यांचा सहभाग होता त्या परमबीर सिंग यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सेवेत घेतले आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगात पाठवल्याची बक्षीसच परमबीर सिंह यांना देण्यात आले आहे. उद्या सचिन वाझे, प्रदीप शर्मा या सगळ्यांनाही क्लीन चिट देण्यात येईल. या सरकारचा काही भरवसा नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.