अ‍ॅपशहर

महाराष्ट्रात सत्तांतराचे दावे करणाऱ्यांना जयंत पाटील यांचा सणसणीत टोला, म्हणाले...

यूपीसह चार राज्यांत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातही सत्तांतराचे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सणसणीत टोला हाणला आहे.

Authored byगणेश कदम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2022, 2:27 pm
मुंबई: पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते ठिकठिकाणी जल्लोष करत असून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेच्या तोफा डागत आहेत. भविष्यात मुंबई व महाराष्ट्र जिंकण्याचा दावाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांना बोचरा टोला हाणला आहे. 'उत्साहाच्या भरात महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करणं चुकीचं आहे,' असं पाटील यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jayant Patil-Devendra Fadnavis
जयंत पाटील यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला


वाचा: 'महाराष्ट्र अभी बाकी है' असं म्हणणाऱ्यांना शरद पवारांचं कडक उत्तर

मुंबईत विधानभवनात ते पत्रकारांशी बोलत होते. 'उत्तर प्रदेशमध्ये मायावतींना यापूर्वी सर्वाधिक मतं पडली आहेत. सर्व पक्ष उत्तर प्रदेशमध्ये एकवटले असते तर नक्कीच विजय झाला असता. भाजपच्या हातातूनही यापूर्वी अनेक राज्य गेली होती, याची आठवणही जयंत पाटील यांनी करून दिली. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धोका नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा: शिवसेनेची अवस्था सुद्धा काँग्रेससारखी दयनीय होईल; 'या' नेत्यानं वर्तवलं भाकीत

केंद्रीय यंत्रणांवर भ्रष्टाचाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे, असा आरोप यूपीतील विजयानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला होता. त्यावरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं. 'यंत्रणांवर दबाव आणण्याचं कारण नाही, पण समन्स न देता नवाब मलिक यांना सहा वाजता घेऊन गेले याची आठवण त्यांनी करून दिली. 'भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करायला काहीच हरकत नाही, परंतु भाजपमधील लोकांवरही कारवाई व्हावी. आम्ही भाजपची यादी दिली आहे कारवाई व्हावी, असं जाहीर आव्हानही जयंत पाटील यांनी दिलं. देश चालवायची जी चुकीची पद्धत आहे, त्याचा विरोध करायला हवा, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. आता केंद्रीय यंत्रणा आक्रमक होतात की पक्ष हे पाहावं लागेल, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

वाचा: करोनाची लाट पुन्हा येऊ शकते? डॉ. गंगाखेडकर म्हणाले…

'जंगजंग पछाडूनही महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. गोव्यात आमच्या पक्षाकडं स्थानिक नेतृत्व सक्षम नव्हतं. आम्ही काँग्रेस सोबत येईल याची वाट पाहत होतो, पण ते होऊ शकलं नाही, अशा शब्दांत त्यांनी गोव्यातील पराभवाचं विश्लेषण केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज