मुंबई: शिवसेनेचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. गीतेंच्या त्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Sunil Tatkare Slams Anant Gite) 'राज्यातील महाविकास आघाडी ही सत्तेसाठी केलेली तडजोड आहे. त्यात दोन काँग्रेस आहेत, पण त्यांचं कधीही एकमेकांशी पटलेलं नाही. जिथं काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकमेकांशी पटत नाही, तिथं शिवसेनेशी त्यांचं कसं पटणार? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत आणि शरद पवार हे शिवसैनिकांचे नेते किंवा गुरू होऊ शकत नाहीत, मग भले त्यांना कुणी 'जाणता राजा' म्हणो किंवा आणखी काही म्हणो,' असं गीते यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा तटकरे यांनी तितक्याच तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
वाचा: 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'
'अनंत गीते हे भाजपच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. स्वत:च्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची वक्तव्यं करण्यात आली, तेव्हा त्यांचा स्वाभिमान गळून पडला होता. खरं तर अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. त्यामुळं वैफल्यातून त्यांनी हे वक्तव्य केल्याचं मला दिसतंय,' असा टोला तटकरे यांनी हाणला. 'उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार देशपातळीवर नावाजलं जात आहे. अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचं भान राहिलं नसेल,' अशी टीकाही तटकरे यांनी केली.
'गीते हे पवार साहेबांबद्दल बोलल्यानं काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा सिद्धांतावर, धर्मनिरपेक्ष विचारांवर, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष आहे. पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळं देशाच्या जडणघडणीत राष्ट्रवादीचे अढळ स्थान आहे. कुणी बोलल्याने ते कमी होणार नाही, असं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.
वाचा: आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'
'अनंत गीते हे दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी पवारसाहेबांच्या पायाला हात लावून आघाडी केल्याबद्दल आभार मानले होते. या घटनेचा मी साक्षीदार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं.
वाचा: 'कुठल्याही शिवसैनिकाची नार्को टेस्ट करा, एकच आवाज येईल, तो म्हणजे...'
'अनंत गीते हे भाजपच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. स्वत:च्या पक्षाच्या नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची वक्तव्यं करण्यात आली, तेव्हा त्यांचा स्वाभिमान गळून पडला होता. खरं तर अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. त्यामुळं वैफल्यातून त्यांनी हे वक्तव्य केल्याचं मला दिसतंय,' असा टोला तटकरे यांनी हाणला. 'उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार देशपातळीवर नावाजलं जात आहे. अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचं भान राहिलं नसेल,' अशी टीकाही तटकरे यांनी केली.
'गीते हे पवार साहेबांबद्दल बोलल्यानं काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा सिद्धांतावर, धर्मनिरपेक्ष विचारांवर, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर विश्वास असणारा पक्ष आहे. पवारसाहेबांच्या उत्तुंग नेतृत्वामुळं देशाच्या जडणघडणीत राष्ट्रवादीचे अढळ स्थान आहे. कुणी बोलल्याने ते कमी होणार नाही, असं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं.
वाचा: आघाडी ही तडजोड; काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत; अनंत गीतेंचा 'बॉम्बगोळा'
'अनंत गीते हे दोन वर्षे अज्ञातवासात की विजनवासात होते हे माहीत नाही, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधीमंडळ नेतेपदी निवड होत असताना वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये अनंत गीते आले होते. त्यावेळी त्यांनी पवारसाहेबांच्या पायाला हात लावून आघाडी केल्याबद्दल आभार मानले होते. या घटनेचा मी साक्षीदार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं.